कल्पना करा की, तुम्ही अशा जगात आहात, जिथे बीन्स, मसूर व हरभरा ही कडधान्ये गायब झाली आहेत. डाळ नाही, मिरची नाही.मसूर, बीन्स, हरभरा व वाटाणे ही कडधान्ये त्यामधील आवश्यक पोषक घटक, वनस्पती-आधारित प्रथिने आणि आहारातील फायबरने भरलेले पौष्टिक पॉवरहाऊस आहेत. ती हृदयाच्या आरोग्यास समर्थन देतात, पचनास मदत करतात, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करतात आणि शाश्वत शेतीत योगदान देतात. जागतिक पोषणात त्यांची भूमिका खूप मोलाची आहे आणि त्यांच्याशिवाय आरोग्यास नुकसानकारक गोष्टी घडतील. त्यांच्या अनुपस्थितीमुळे मानवी आरोग्य, आहार आणि पर्यावरणाचा तोल ढळेल.

डाळी खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. आपल्या शरीराला जे घटक, प्रथिने पाहिजे असतात, ते आपल्याला डाळींतून मिळतात. मात्र, अनेक लोक डाळी खाणे टाळतात हे अतिशय चुकीचे आहे. तुम्हीही जर तुमच्या आहारात डाळींचा समावेश करणे टाळत असाल, तर जाणून घ्या त्याचा शरीरावर काय परिणाम होतो.

कल्पना करा की, तुम्ही अशा जगात आहात जिथे डाळी, कडधान्ये गायब झाली आहेत. जसे की मसूर, हरभरा व वाटाणे यांतील आवश्यक पोषक घटक प्रथिने आणि आहारातील फायबरने भरलेले आहेत. ते हृदयाच्या आरोग्यास समर्थन देतात, पचनास मदत करतात, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करतात. त्यांचा जर आहारात समावेश केला गेला नाही, तर मानवी आरोग्य, आहार आणि पर्यावरणावर कसा विपरीत परिणाम होईल ते जाणून घ्या.

डाळी न खाल्ल्यास होणारे परिणाम

प्रथिने नाहीत- स्नायूंची वाढ कमी होणे आणि कमकुवत होणे. शाकाहारी लोकांसाठी डाळी प्रथिनांच्या सर्वांत सुलभ आणि परवडणाऱ्या स्रोतांपैकी एक आहेत, विशेषतः बजेटमध्ये असलेल्यांसाठी. (की- प्रथिनांअभावी स्नायू कमजोर : ज्यांची परिस्थिती बेताची आहे, अशा शाकाहारी लोकांसाठी डाळी हा प्रथिनांच्या सर्वांत सुलभ व परवडणाऱ्या स्रोतांपैकी एक आहे. प्रथिनांअभावी स्नायूंची वाढ कमी होते आणि ती कमकुवत होतात.)???

फायबरअभावी आतड्यांसंबंधीच्या समस्या : पचनक्रिया बिघडते आणि आतड्यांसंबंधीच्या समस्या उद्भवतात. त्याशिवाय पचनसंस्थेला त्रास होईल. डाळी या फायबरने समृद्ध असतात आणि आतड्याच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात. डाळी रोगप्रतिकार शक्ती आणि पचनास मदत करतात. फायबरचे सेवन कमी झाल्यास बद्धकोष्ठता, पोटफुगी आणि आतड्यांशी संबंधित समस्या वाढतील. त्यामुळे कोलोरेक्टल कर्करोग, टाईप-२ मधुमेह आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोकादेखील वाढू शकतो. सोप्या भाषेत सांगायचे तर, डाळी सर्व काही गतिमान ठेवतात.

पोषक घटकांअभावी आरोग्याचे नुकसान : डाळींचे सेवन न केल्याने लोहाची कमतरता जाणवू शकते आणि प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते. डाळींमध्ये लोह, फोलेट, मॅग्नेशियम, पोटॅशियम व झिंक भरपूर प्रमाणात असते. लोह व फोलेट अशक्तपणा रोखतात व वाढीस मदत करतात आणि मॅग्नेशियम व पोटॅशियम हृदय नियंत्रित ठेवतात. झिंक रोगप्रतिकार शक्ती आणि विकासात महत्त्वाची भूमिका बजावते.

डाळी केवळ मानवासाठीच उपयुक्त नाहीत तर त्या पर्यावरणासाठीही आवश्यक आहेत. त्यांची नायट्रोजन-फिक्सिंग क्षमता माती समृद्ध करते, ज्यामुळे शेती अधिक शाश्वत होते. इतर पिकांच्या तुलनेत त्यांना वाढण्यासाठी कमी पाणी लागते. डाळींशिवाय शेतकऱ्यांना संसाधनांनी भरलेली पिके आणि पशुपालनावर अवलंबून राहावे लागेल, ज्यामुळे पाणी आणि जमिनीच्या वापरावर अधिक दबाव येईल. याचा अर्थ अन्न उत्पादनासाठी कमी शाश्वत भविष्य आणि पर्यावरणीय नुकसान वाढेल.

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढेल : डाळींचे सेवन न केल्याने मधुमेहाचा धोका वाढतो. डाळीच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी स्थिर करण्यासाठी मदत मिळते. त्याशिवाय मधुमेह असलेले लोक किंवा जोखीम असलेल्यांना रक्तातील साखरेचे नियमन करण्याचा नैसर्गिक मार्ग डाळींद्वारे शरीराला मिळतो.

लठ्ठपणाशी संबंधित आजारांत वाढ: डाळींचे सेवन न केल्याने वजन वाढते, आळस येऊ शकतो आणि लठ्ठपणाशी संबंधित आजारांमध्ये वाढ होऊ शकते. पण, डाळीच्या सेवनाने ऊर्जेची पातळी स्थिर राहते.

निष्कर्ष : डाळींशिवाय जग पौष्टिकतेच्या दृष्टीने गरीब होईल आणि आरोग्यदायी राहू शकत नाही. डाळींअभावी प्रथिने, फायबर आणि आवश्यक पोषक घटक मिळवणे कठीण होईल, ज्यामुळे पचनाचे विकार, अशक्तपणा आणि जुनाट आजार वाढतील.

Story img Loader