प्रख्यात गायिका लता मंगेशकर यांचे रविवारी सकाळी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये गायिकेवर उपचार करणार्‍या डॉ. प्रतित समदानी यांच्या म्हणण्यानुसार, लता मंगेशकर यांचे मल्टीपल ऑर्गन फेल्यूअर अर्थात अनेक अवयव निकामी झाल्यामुळे निधन झाले. हा आजार नक्की कसा असतो आणि याची काय लक्षणं आहेत त्यापासून मल्टिपल ऑर्गन फेल्युअर म्हणजे काय तसेच बचाव कसा करायचा हे जाणून घ्या.

मल्टिपल ऑर्गन फेल्युअर म्हणजे काय?

शरीरातील दोन किंवा अधिक अवयव एकत्र काम करणे थांबवतात या स्थितीला मल्टिपल ऑर्गन फेल्युअर म्हणतात. तसेच याला मल्टिपल ऑर्गन डिसफंक्शन सिंड्रोम देखील म्हणतात. हे रोगप्रतिकारक शक्तीसह संपूर्ण शरीरावर परिणाम करतात.

One GBS patient detected in Sangli city and five to six in rural areas all receiving treatment in private hospitals
सांगलीत ‘जीबीएस’चे सहा रुग्ण आढळले, आरोग्य यंत्रणा सतर्क, उपचार सुरू
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Guillain-Barré Syndrome in Kolkata
‘जीबीएस’चे आता महाराष्ट्राबाहेरही थैमान; कोलकातामध्ये दोन मुलांचा मृत्यू
Symptoms and Treatment of Guillain-Barré Syndrome in Pune
Guillain-Barre Syndrome Pune: पुणेकरांना पिण्याच्या पाण्याबाबत पालिका आयुक्तांचं ‘हे’ आवाहन; जीबीएसचा उल्लेख करत म्हणाले…
Guillain Barre syndrome outbreak in Pune
Guillain Barre Syndrome :‘जीबीएस’ची रुग्णसंख्या ७३ वर; ३० जण आयसीयूमध्ये तर १४ जण व्हेंटिलेटरवर
Guillain Barre syndrome, contaminated water,
दूषित पाणी अथवा अन्नामुळे गुइलेन बॅरे सिंड्रोम! काळजी काय घ्यावी जाणून घ्या…
Guillain Barre Syndrome cases in Pimpri Chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’चे रुग्ण किती? वैद्यकीय विभागाने काय केले आवाहन?
What causes the rare disorder Guillain Barre Syndrome to occur in Pune news
पुण्यात दुर्मीळ ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’ विकाराची बाधा कशामुळे? रुग्णांच्या तपासणीतून कारण आलं समोर…

मल्टिपल ऑर्गन फेल्युअर होण्याचे कारण

साइटोकिन्सचे उत्पादन रोगप्रतिकारक प्रणालीद्वारे होते. पेशी आणि इतर कार्यांच्या विकासामध्ये सायटोकिन्स महत्त्वाची भूमिका बजावतात. तसेच ते पेशींना सूचित करून रोगप्रतिकारक शक्ती सक्रिय ठेवतात. याव्यतिरिक्त शरीरात ब्रॅडीकिनिन प्रथिने असतात. दरम्यान शरीरात यासर्वांचे प्रमाण जास्त झाल्यास अनेक अवयव निकामी होतात. या स्थितीत शरीरातील रक्ताभिसरण प्रभावित होते. त्यामुळे शरीरात जळजळ होते. यासोबतच रक्ताच्या गुठळ्याही तयार होऊ लागतात.

हिरड्यांच्या समस्येने त्रस्त आहात? तर ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा आराम

लक्षणे आणि बचाव

तज्ज्ञांच्या मते दिवसभर लघवी न होणे, अंग थरथरणे, श्वासोच्छवासाचा त्रास होणे, स्नायूंमध्ये वाढ होणे अशा लक्षणाकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा. दुर्लक्ष केल्यास ते धोकादायक ठरू शकते.

Story img Loader