मधुमेह हा इतका आजार आहे की त्यावर नियंत्रण न ठेवल्यास शरीराच्या इतर भागाला हानी पोहोचू लागते. भारतात कोरोना महामारीनंतर मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. मधुमेहाचे टाइप-१ आणि टाइप-२ असे दोन प्रकार आहेत. दोन्ही प्रकारचे मधुमेह शरीराचे नुकसान करतात. टाइप १ मधुमेहामध्ये, स्वादुपिंड इन्सुलिन अजिबात तयार करत नाही, तर टाइप २ मधुमेहामध्ये, स्वादुपिंड कमी इन्सुलिन तयार करतो. भारतात टाइप-२ मधुमेहाच्या रुग्णांची संख्या जास्त आहे.

मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी जीवनशैली आणि आहारात बदल करणे आवश्यक आहे. अयोग्य आहार आणि खराब जीवनशैलीमुळे हा आजार लहान वयातच लोकांना बळी ठरत आहे. मधुमेही रुग्णांनी रक्तातील साखरेची पातळी राखणे महत्त्वाचे आहे. मधुमेही रुग्णांनी साखरेची नियमित तपासणी करावी अन्यथा किडनी, हृदय आणि फुफ्फुसांना इजा होऊ शकते.

Nutrition Diet , Maharashtra School, Sweet Food ,
पोषण आहार बदल! साखर लोकांना मागा पण गोडधोड खाऊ घाला, अनुदान नाहीच
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
india sugar production declines by 2 million tonnes
देशांतर्गत साखर उत्पादनात २० लाख टनांची घट; घट ४० लाख टनांवर जाण्याची भीती
GBS patients pune, GBS , Health Department ,
पुण्यात ‘जीबीएस’च्या रुग्णसंख्येतील वाढ सुरूच; आरोग्य विभागाचा सर्वेक्षणावर भर
How much sugar has been produced in Maharashtra and how much will be produced Mumbai print news
राज्याने साखर उत्पादनाचा महत्त्वाचा टप्पा गाठला; जाणून घ्या, साखर उत्पादन किती झाले, किती होणार 
number of Guillain Barre Syndrome GBS patients in state has reached 101 of which 16 patients are on ventilators
जीबीएसच्या रुग्णांत मोठी वाढ अन् एकाचा मृत्यू! रुग्णसंख्या शंभरपार; निम्म्याहून अधिक ‘आयसीयू’त
Ambalika sugars factory awarded best in state for quality and efficiency
अंबालिका शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड सर्वोत्कृष्ट साखर कारखाना; ‘व्हीएसआय’चे पुरस्कार जाहीर
How much sugar will be exported from Maharashtra mumbai news
दहा लाख टन साखर निर्यातीला परवानगी; जाणून घ्या, महाराष्ट्रातून किती साखर निर्यात होणार

वयानुसार साखरेची सतत तपासणी करणे आवश्यक आहे, कारण वयोमानानुसार रक्तातील साखरेचे प्रमाणही वाढू लागते. वाढत्या वयाबरोबर रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन शरीर कमजोर होऊ लागते. या वयात साखरेवर नियंत्रण ठेवले नाही तर आजारांचा धोका वाढू शकतो. ६० वर्षांच्या वृद्धांची फास्टिंग शुगर, जेवणानंतर साखर किती असावी हे तपासणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊया वयानुसार रक्तातील साखरेचे प्रमाण काय असावे.

Heart Attack: चेहऱ्याच्या ‘या’ भागांमधील वेदनेकडे दुर्लक्ष करू नका; असू शकतो हृदयविकाराचा इशारा

वयाच्या ६० नंतर रक्तातील साखर किती असावी?

  • आरोग्य तज्ञांच्या मते, ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये उपवास रक्तातील साखरेचे प्रमाण ९० ते १३० mg/dL दरम्यान असावे.
  • जेवणानंतर साखरेची पातळी १४० mg/dl च्या खाली असणे महत्वाचे आहे.
  • रात्रीच्या जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी १५० mg/dl सामान्य मानली जाते.
  • झोपेच्या वेळी रक्तातील साखरेची पातळी १५० mg/dL पेक्षा जास्त नसावी.

लहान मुलांपासून तरुणांपर्यंत फास्टिंग शुगर किती असावी?

  • प्रौढांसाठी रक्तातील साखरेचे प्रमाण ९० ते १३० mg/dL असावे.
  • १३ ते १९ वयोगटातील मुलांसाठी हे प्रमाण ९० ते १३० mg/dL
  • ६ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांसाठी ९० ते १८० mg/dL
  • ६ वर्षाखालील मुलांसाठी १०० ते १८० mg/dL

तुम्हालाही छातीच्या उजव्या बाजूला वेदना जाणवतात का? यामागे असू शकते ‘हे’ कारण

जेवणानंतर १-२ तासांनंतर रक्तातील साखर किती असावी?

  • प्रौढांसाठी १८० mg/dL पेक्षा कमी

झोपेच्या वेळी तुमच्या रक्तातील साखर असावी?

  • प्रौढांसाठी ९० ते १५० mg/dL
  • १३ ते १९ वयोगटातील मुलांसाठी ९० ते १५० mg/dL
  • ६ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांसाठी १०० ते १८० mg/dL
  • ६ वर्षाखालील मुलांसाठी ११० ते २०० mg/dL

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader