जगण्यासाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे. पाणी प्रत्येकजण पितो, पण तुम्हाला पाणी पिण्याची योग्य पद्धत माहित आहे का, आणि तुम्ही ज्या पद्धतीने पाणी पितात आणि ते पिण्याची योग्य वेळ योग्य आहे का? तुम्ही ऐकले असेल की आपल्या शरीरात सर्वात जास्त पाणीच असते, परंतु तुम्हाला माहित आहे का की योग्य वेळी पाणी पिऊन तुम्ही लठ्ठपणा, डोकेदुखी आणि पचन यांसह अनेक समस्यांवर मात करू शकता. याबाबत नेफ्रोलॉजीचे वरिष्ठ सल्लागार डॉ. उमेश कुमार शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी पाणी पिण्याचे फायदे आणि योग्य वेळ सांगितली.

पाणी पिण्याची गरज का आहे?

आपल्या शरीरातील ७५ टक्के भाग पाण्याने व्यापलेला असतो. लहान मुलांच्या शरीरात पाण्याचे प्रमाण ८० ते ८५ टक्के असते. दुसरीकडे, कमी पाणी पिल्याने, आपण डिहायड्रेशनचे शिकार होतो, ज्यामुळे आपल्या अवयवांचे नुकसान होऊ शकते. वयोवृध्द लोकांना कमी पाणी प्यायल्याने अनेक वेळा ऍडमिट देखील व्हावे लागते.

penaut oil for diabetis patients?
शेंगदाण्याचं तेल डायबेटिस असणाऱ्यांनी वापरावं का?
really fasting between 5.30 pm and 10 am is best for belly fat loss
सायंकाळी ५.३० ते सकाळी १० पर्यंत काहीही न…
Rujuta Diwekar Shared Anti inflammation diets tips
‘टीव्ही, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम करा बंद… ‘ अँटी-इन्फ्लमेटरी डाएटबद्दल सेलिब्रिटी डाएटिशियन Rujuta Diwekar ने नक्की काय सांगितले?
drinking tea is beneficial to health?
चहाची तलफ आलेय, काय करावं?
Hair serums demystified: Guide to help you choose one based on your hair type which Hair Serum for Hair Growth
तुमच्या केसांसाठी कोणते सिरम योग्य आहे? डॉक्टरांनी सांगितलेली माहिती एकदा वाचाच, केस दिसतील चमकदार
Liver health 5 Fruits That Will Hydrate Your Liver And Keep It Running Smoothly
यकृत निरोगी ठेवायचं? यकृताच्या आरोग्याची चिंता सतावतेय? ‘ही’ फळे खा अन् टेन्शन विसरा!
Why you should eat your meals in the sun right time to consume breakfast lunch and dinner
जर तुम्ही दररोज सूर्यप्रकाशात बसून जेवण केलं तर शरीरावर काय परिणाम होईल? आहारतज्ज्ञांनी सांगितली माहिती
water intake
पाणी कसे व किती प्यावे?
Union Budget 2025 FM Sitharaman announces creation of Makhana Board read Makhana Benefits
Union Budget 2025 : अर्थसंकल्पात मखाणा उत्पादनावर निर्मला सीतारामण यांचे भाष्य; पण मखाणा खाण्याचे नेमके फायदे काय जाणून घ्या

( हे ही वाचा: Curd In Winter: हिवाळ्यात दही खावं की नाही? काय सांगत आयुर्वेद आणि विज्ञान)

तुम्ही किती पाणी पिता?

डॉक्टरांच्या मते, पाण्याचे कोणतेही निश्चित प्रमाण नसते, ते वेळ, ठिकाण, ऋतूनुसार कमी-जास्त असू शकते. डॉक्टरांनी सांगितल्या प्रमाणे प्रत्येकाने नेहमी पाण्याची बाटली स्वतःजवळ ठेवावी, जेणेकरुन तुम्हाला तहान लागल्यावर पाणी पिता येईल. तुम्हाला एकाच वेळी तीन ते चार ग्लास पाणी पिण्याची गरज नाही, काही तासांनी पाणी पित राहा.

झोपेतून उठल्याबरोबर पाणी का प्यावे?

डॉक्टरांनी सांगितले की रात्रभर शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते, त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर किमान एक ग्लास पाणी प्यावे. असं न केल्यास रक्त घट्ट होऊन हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

( हे ही वाचा: Uric Acid: जेव्हा यूरिक अॅसिडची पातळी १० mg/dL पेक्षा जास्त होते, तेव्हा शरीर देऊ लागते ‘या’ प्रकारचे भयंकर संकेत)

व्यायाम करतानाही पाणी प्यावे

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, वर्कआउट करताना आपल्याला खूप घाम येतो, त्यामुळे वर्कआउट करताना थोडेसे पाणी प्यावे आणि नंतरही भरपूर पाणी प्यावे.

गरम पाणी प्यावे की थंड?

डॉक्टर म्हणाले की, उन्हाळ्यातही गरम पाणी पिण्याची गरज नाही, तुम्ही सामान्य तापमानाचे पाणी प्या. फ्रीजमधील थंड पाणी नक्कीच नुकसान करते. त्यामुळे ते पिणे टाळावे. हिवाळ्यात तुम्ही कोमट पाणी पिऊ शकता.

( हे ही वाचा: Uric Acid: जास्त पाणी प्यायल्याने युरिक अॅसिड कमी होऊ शकते का? गाउट अटॅक कमी करण्यासाठी ‘हे’ उपाय जाणून घ्या)

कोणत्या गोष्टींनंतर पाणी पिऊ नये?

डॉक्टरांनी सांगितले की, फळामध्ये भरपूर पाणी असते, त्यामुळे फळ खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये. त्याचप्रमाणे भात बनवल्यास ते भरपूर पाणी शोषून घेते, त्यामुळे भात खाल्ल्यानंतरही पाणी पिऊ नये. अर्धा तास थांबल्यानंतर तुम्ही पाणी पिऊ शकता.

Story img Loader