अंघोळीच्या संबंधी आपल्या सवयी सतत बदलत असतात. हिवाळ्यात अनेकजण काही दिवस अंघोळ करत नाहीत, तर उन्हाळ्यात बरेचजण दिवसातून दोन-तीन वेळा अंघोळ करतात. परंतु आपल्याला अंघोळीचे महत्त्व समजून घ्यायला हवे आणि आपल्या जीवनशैलीशी संबंधित इतर गोष्टींप्रमाणेच तुम्ही अंघोळीसाठी काही नियमांचीही विशेष काळजी घेतली पाहिजे. अनेक तज्ञ सकाळपेक्षा संध्याकाळी अंघोळ करणे अधिक फायदेशीर मानतात. कारण अंघोळ करताना तुम्ही केवळ शरीराची स्वच्छता करत नाही, तर त्या वेळी तुमचे रक्ताभिसरणही सुधारते आणि अंघोळ केल्याने तुमची मानसिक उदासीनताही दूर होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

म्हणूनच अंघोळ केव्हा करावी आणि कधी करू नये हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तर आज आपण जाणून घेणार आहोत की तुम्ही तुमची अंघोळीची वेळ कशी ठरवावी. तसेच अंघोळ करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी.

कडक उन्हापासून वाचण्यासाठी तुम्हीही वापरत आहात स्वस्तातले गॉगल्स? जाणून घ्या याचे दुष्परिणाम

अंघोळीची वेळ :

आपण सर्वजण सहसा सकाळी उठतो आणि फ्रेश होऊन अंघोळ करतो. आपल्यापैकी अनेकजण उन्हाळ्यात संध्याकाळीही अंघोळ करतात. पण तुम्हाला माहित आहे का की डॉक्टरांच्या मते, सकाळी अंघोळ करण्यापेक्षा संध्याकाळी अंघोळ करणं जास्त फायदेशीर आहे. खरे तर दिवसभराच्या कामात सगळी धूळ आणि माती तुमच्या शरीरावर आणि केसांवर जमा होते. विशेषतः उन्हाळा आणि पावसाळ्यात. अशा स्थितीत झोपण्यापूर्वी अंघोळ केल्याने तुम्ही स्वच्छ होतात. यासोबतच तुमचे मनही शांत होते आणि तुम्हाला चांगली झोप लागते. त्यामुळे सकाळी अंघोळ करण्याबरोबरच संध्याकाळी अंघोळीची सवय जास्त चांगली असते.

संध्याकाळी अंघोळ करण्याचे फायदे :

संध्याकाळी अंघोळ केल्याने दिवसभरात शरीरावर साचलेली सर्व धूळ आणि घाण निघून जाते. याच्या मदतीने तुम्ही अनेक प्रकारच्या संसर्ग आणि आजारांपासून सुरक्षित राहता. संध्याकाळी अंघोळ केल्याने तुमचा रक्तदाबही नियंत्रणात राहतो. उन्हाळ्यात दिवसभराच्या उकाड्यापासून सुटका मिळवण्यासाठी संध्याकाळी अंघोळ करणे हा एक चांगला पर्याय आहे. तसेच, अंघोळ केल्याने तुम्हाला ताजेपणाची भावना येते आणि हृदय आणि मन शांत होते, ज्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते. म्हणूनच संध्याकाळी अंघोळ करणे अनुकूल आहे.

यंदाच्या उन्हाळ्यात Solo Trip चा विचार करताय?; या ठिकाणांचा एकदा नक्की विचार करा

अंघोळ कधी करू नये?

जसे संध्याकाळच्या अंघोळीचे फायदे आहेत आणि त्याचप्रमाणे अशा काही वेळा आहेत जेव्हा अंघोळ करू नये. कारण अशावेळी अंघोळ केल्याने आरोग्यापेक्षा जास्त हानी होते. काही खाल्ल्यानंतर लगेच अंघोळ केल्याने आरोग्याला खूप नुकसान होते.

आयुर्वेदात जेवणानंतर एक ते दोन तास अंघोळ करण्यास मनाई आहे. याशिवाय उन्हाळ्यात दिवसभरात अनेक वेळा आंघोळ करण्याची सवय असेल तर ती टाळा.

(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When to take a bath and when to avoid it what are the benefits of taking a bath at what time of day pvp