जेव्हा आपण कोणाला कॉल करतो, त्याआधी आपण नंबर तपासतो की तो नंबर १० अंकी आहे की नाही? चुकून तुम्ही ९ किंवा ११ अंकी नंबर डायल केला तर फोन वाजत लागतच नाही. तुम्हाला माहित आहे का मोबाईल नंबर फक्त १० अंकांचाच का असतो? आणि त्यामागचे कारण काय आहे? चला जाणून घेऊयात.

हे NNP मुळे घडते

सरकारची नॅशनल नंबरिंग स्कीम म्हणजेच NNP भारतात १० अंकी मोबाईल नंबर असण्यामागे आहे. जर मोबाईल नंबर एक अंकाचा असेल तर ० ते ९ पर्यंत फक्त १० वेगवेगळे नंबर बनवता येतात. त्यानंतर फक्त १० नंबर बनवले जातील आणि एकूण १० लोकच त्यांचा वापर करू शकतील. दुसरीकडे, २ अंकी मोबाइल क्रमांक असला तरीही ० ते ९९ पर्यंतचे फक्त १०० नंबर बनवता येतात आणि ते फक्त १०० लोक वापरू शकतील.

Viral video young boy sitting on railway track while talking phone video goes viral social Media
जीव एवढा स्वस्त असतो का? रेल्वे रुळावर फोनवर बोलत बसला; समोरुन ट्रेन आली अन्…VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Airtel vs Jio vs Vi Recharge Plans
Airtel vs Jio vs Vi: फक्त कॉल आणि एसएमएस रिचार्जकरिता कोण देत आहे सर्वात स्वस्त प्लॅन? रोजचा खर्च येईल फक्त ५ रुपये
Speed ​​Limit, Signal Violation, Accident, Nagpur,
तुम्हीही ‘सिग्नल’ तोडता का? मग ‘हे’ वाचाच, कारण वर्षभरात तब्बल….
Father Disappointed After Seeing Daughters English In Whatsapp Chat Viral on social media
PHOTO: वडिलांनी मुलीला ४० हजार पाठवल्याचा मेसेज केला; यावर मुलीचा रिप्लाय पाहून वडिल झाले शॉक; व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल
Airtel 90-Day Recharge Plan
Airtel चा स्वस्तात-मस्त प्लॅन! डेटा-कॉलिंगसह मिळणार भरपूर फायदे; केवळ इतक्या किंमतीत मिळेल ९० दिवसांची व्हॅलिडिटी
strict action against students if found with a mobile phone in an exam
खबरदार ! परीक्षेत विद्यार्थ्याकडे मोबाईल आढळल्यास आता इतके वर्ष…
IMEI Number for mobile phone
चोरी गेलेला मोबाईल पुन्हा मिळवण्यासाठी IMEI नंबर आहे महत्त्वाचा, कसा मिळवाल ‘हा’ क्रमांक? जाणून घ्या

( हे ही वाचा: ‘या’ चार राशीच्या मुली मानल्या जातात खूप हुशार; करिअरमध्ये गाठतात उंची! )

देशाची लोकसंख्या हेही एक कारण

याचे दुसरे कारण म्हणजे भारताची लोकसंख्या. सध्या देशाची लोकसंख्या सुमारे १३० कोटी आहे. सम क्रमांक नऊचा मोबाईल क्रमांक वापरला असता, तर भविष्यात हा क्रमांक सर्व लोकांना देता येणार नाही. त्याच वेळी, जेव्हा १० अंकी मोबाइल नंबर बनविला जातो, तेव्हा गणनानुसार एक हजार कोटी वेगवेगळे नंबर बनवता येतात. त्यामुळेच भविष्यात नंबर्सची वाढती मागणी लक्षात घेऊन १० अंकी मोबाईल नंबर करण्यात आला.

( हे ही वाचा: ‘या’ आहेत कमी बजेटमध्ये ७६ Kmpl पर्यंत मायलेज देणाऱ्या वजनाने हलक्या स्टायलिश टॉप ३ स्कूटी! )

पूर्वी संख्या होती 9 अंकी

हे लक्षात घेण्यासारखे आहे की २००३ पर्यंत देशात फक्त ९ अंकी मोबाईल क्रमांक होते. पण वाढती लोकसंख्या पाहता ट्रायने त्यात १० अंकांचा नंबर सुरु केला आहे. त्याच वेळी, १५ जानेवारी २०२१ पासून, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने लँडलाइनवरून कॉल करताना नंबरसमोर शून्य ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. डायलिंग पद्धतीतील हा बदल दूरसंचार कंपन्यांना मोबाइल सेवांसाठी २५४.४ दशलक्ष अतिरिक्त क्रमांक तयार करण्यास अनुमती देईल.

Story img Loader