निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांची आवड असणाऱ्यांसाठी बाली हे सर्वात लाडके ठिकाण. जगभरातून पर्यटक येथे येत असतात. सर्व प्रकारच्या आधुनिक सोयी-सुविधांच्या सोबतीनेच निसर्गाचा पुरेपूर आनंद देणारे पर्यटन स्थळ म्हणून बालीचा लौकिक. अधिकृतपणे मुस्लीम राष्ट्र असलेल्या इंडोनेशियातील बाली हा हिंदूबहुल प्रांत आहे. मध्य जावामध्ये साधारण नवव्या शतकापर्यंत असणाऱ्या हिंदू राजांनी ज्वालामुखीमुळे बाली बेटांकडे स्थलांतर केल्याचे सांगितले जाते. तर एका राजपुत्राने आपलं स्वत:चं राज्य असावं या ओढीने बालीतल्या उबुद भागात आपली सत्ता स्थापित केली. याच उबुदमध्ये बालीतील सर्वाधिक मंदिरं आहेत. या मंदिरांमधले महत्त्वाचे मंदिर म्हणजे सरस्वतीचे मंदिर. आपल्या देशातदेखील सरस्वतीची अगदी मोजकीच मंदिरं आहेत. पण बालीतले हे मंदिर अत्यंत प्रशस्त आहे. उबुदच्या पट्टय़ात सर्वाधिक मंदिरे बांधली गेल्यामागे मरकण्डी ॠषीची कथा सांगितली जाते. मार्कण्डी जेव्हा या भागात आले तेव्हा रोगराईपासून वाचण्यासाठी त्यांनी देवांची आराधना केली आणि मंदिरं बांधली अशी अख्यायिका सांगीतली जाते. उत्तर बालीमध्ये असणारे मदर टेंपल हे त्यापकीच एक. मदर टेंपल बहुतांशपणे बालीच्या पर्यटन पॅकेजमध्ये हमखास असते. पण उदुबमधील सरस्वती मंदिर मात्र पर्यटकांपासून तुलनेने दूरच. मार्कण्डीने डोंगरात एका विशिष्ट पातळीवर सर्व मंदिरं वसवली असल्याची येथील जनतेची श्रद्धा आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा