भक्ती बिसुरे – response.lokprabha@expressindia.com
आजवर कधीही कल्पना न केलेले जग करोना महासाथीमुळे आपल्याला पाहावे लागले. कामधंदा बंद, मुलांच्या शाळा, मैदाने, बागा बंद, बाजारपेठा, उद्योग, वाहतूक सगळं काही ठप्प. करोना महासाथीतून मार्ग काढण्यासाठी नाइलाजाने किंवा मनाविरुद्ध का होईना, आपण र्निबध स्वीकारले. सरकारने घालून दिलेले नियम पाळले. रुग्णसंख्येतील चढउतारांसह कधी सैल तर कधी घट्ट होत जाणारा र्निबधांचा फास संयमाची परीक्षा पाहणारा ठरला. पण, जीव वाचवण्याच्या काळजी आणि भीतीने ते र्निबध सर्वानीच आपलेसे केले. ओमायक्रॉन या करोनाच्या नव्या प्रकारामुळे आलेली तिसरी लाट आली तशीच वेगाने ओसरलीसुद्धा. त्यामुळे नाही म्हटले तरी सर्वसामान्य माणसांसह सरकार, यंत्रणा आणि प्रशासन या सगळय़ांना दिलासा मिळाला. तशातच, आता केंद्र सरकारने करोना प्रतिबंधासाठी घालून दिलेले र्निबध मागे घेण्याच्या सूचना राज्य सरकारांना दिल्या आहेत. दोन वर्षे सतत कमी- अधिक र्निबधांच्या सावटाखाली जगल्यानंतर र्निबध उठवले जाण्याची साधी शक्यताही अत्यंत चैतन्यदायी वाटावी, अशी स्थिती आहे. मात्र, संसर्ग आटोक्यात आलेला असला तरी करोना विषाणूतील उत्परिवर्तनांची प्रक्रिया ही पुढील काही काळ सातत्याने सुरू राहण्याची शक्यता आहे. वरवर पाहता अत्यंत सौम्य असलेला ओमायक्रॉनचा संसर्ग लसीकरण न झालेल्या आणि जोखीम गटातील रुग्णांसाठी गंभीर रूप धारण करणारा ठरला हे तिसऱ्या लाटेच्या काळात आपण पाहिले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा