विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com
काही महिन्यांमध्ये उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर, उत्तराखंड आणि पंजाब या राज्यांमध्ये निवडणुका होऊ घातल्या आहेत. २०२४ साली लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकांचा कल कोणत्या दिशेने जाणार हे ठरविणाऱ्या निवडणुका म्हणून या पाच राज्यांच्या आणि वर्षअखेरीस होणाऱ्या गुजरातेतील निवडणुकांकडे पाहिले जात आहे. त्यामुळेच सर्व राजकीय पक्षांसाठी या निवडणुकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यातही उत्तर प्रदेश हे राज्य सर्वाधिक महत्त्वाचे आहे, सर्वच राजकीय पक्षांसाठी. या खेपेस भाजपाला उत्तर प्रदेशात विजय मिळाला तरी तो तेवढा सोपा नक्कीच नसेल असे राजकीय धुरीणांना वाटते आहे. इथली निवडणूक पूर्वीइतकी सोपी नाही, याची पंतप्रधान मोदी यांनाही कल्पना आहे, हे त्यांनी उत्तर प्रदेशातील मोठय़ा प्रकल्प आणि योजनांच्या उद्घाटनाच्या लावलेल्या धडाक्यातून स्पष्ट झाले आहे. उत्तर प्रदेशप्रमाणेच रोचक असेल ती पंजाबातील निवडणूक. उरलेसुरले पंजाबही काँग्रेसच्या हातून निसटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अमिरदर सिंग यांनी भाजपाशी साधलेली जवळीक काँग्रेससाठी पंजाबची निवडणूक कठीण करणारी असेल. त्यातच ‘आप’नेही इथे जोरदार मुसंडी मारण्याची तयारी ठेवली आहे. शेतकरी आंदोलनाचा पंजाबमध्ये काही प्रभाव राहिला आहे का, हेही हीच निवडणूक स्पष्ट करेल. गोव्यातही भाजपाची सत्तेसाठी मोर्चेबांधणी झालेली दिसते आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा