अण्णा हजारेंच्या आंदोलनात तरुणाईने दिलेला भरघोस प्रतिसाद यापूर्वी जनतेने अनुभवला आहे. एकीकडे तरुणाईची ही काम करण्याची इच्छा आणि शक्ती, आणि दुसरीकडे देशात मोठय़ा संख्येने असलेला तरुणवर्ग या दोन्ही गोष्टींचा उपयोग करून घ्यायचे राजकीय पक्षांनी ठरवले आहे. निवडणुकांच्या दृष्टीने याचा कसा फायदा होईल यासाठी विविध मार्ग आखले गेले. त्यामुळे तरुणांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी, त्यांचे अधिकार मिळविण्यासाठी हक्काचं व्यासपीठ मिळालं आहे. त्याबरोबरच समाजाभिमुख, समाजोपयोगी काम केल्याचं समाधान मिळत आहे. या अनुभवाचा त्यांना भविष्यात नक्कीच फायदा होऊ शकेल. शिवाय या तरुण रक्तामधूनच देशासाठी उद्याचा एक जबाबदार नेता मिळेल. विविध पक्षांबरोबर काम करणाऱ्या अशाच काही तरुण कार्यकर्त्यांशी संवाद झाला.
किरण साळुंखे (वय २५ वर्षे) ‘डिलोइट’ कंपनीत तांत्रिक सल्लागार म्हणून नोकरी करतो. त्याबरोबरच भाजपासाठी पर्यायाने नरेंद्र मोदींसाठी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर ‘मिशन २७२ प्लस’ साठी काम करत आहे. किरणसारखे आणखीही तरुण आहेत, ज्यांचं उद्दिष्ट आहे, लोकसभेतील ५४६ जागांमधील २७२ जागा भाजपाला मिळवून देणं आणि भाजपाची निर्विवाद सत्ता प्रस्थापित करणं, जे २७२ प्लसचे ध्येय आतापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाला स्वबळावर करणं जमलेलं नाही. किरण साळुंखे त्याच्या सहभागाबद्दल म्हणाला, ‘‘ही माझी कुठल्याही राजकीय पक्षाबरोबर निवडणुकीसाठी काम करण्याची पहिलीच वेळ आहे. मी भाजपाला पाठिंबा देतो कारण अनेक वर्षे मी भाजपाच्या राज्यांचा विकास बघतोय. नरेंद्र मोदींनी गुजरातचा
गुजरातमध्ये बेरोजगारीचा दर केवळ ०.९% आहे. मोदींनी अवलंबलेली मूल्यमापन पद्धती राजकारण आणि समाजाच्या भविष्यासाठी अनुरूप आहे व मला ही पद्धत जास्त भावते. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कामासाठी जबाबदार ठरविल्यानेच समाजाचा विकास आणि अंतिम ध्येय साधता येऊ शकतं.’ असं किरण सांगतो.
भाजपाबरोबरच काम करणाऱ्या आणि घाटकोपर-मुलुंड या मतदारसंघाचा ‘लोकसभा मतदारसंघ दुवा’ ही जबाबदारी असलेल्या संजय गुमत यांच्याशी संवाद साधला, तेव्हा ते म्हणाले की, ‘‘माझं किराणा मालाचं दुकान आणि इंटरनेट निगडित व्यवसाय आहे व ते सांभाळून मी नरेंद्र मोदींसाठी काम करत आहे. मी गुजराती आहे, त्यामुळे माझे गुजरातला बऱ्याचदा जाणं-येणं होत असतं. तिथे मी नरेंद्रजींनी गुजरातची केलेली प्रगती बघितली आहे. म्हणूनच त्यांच्यासाठी मी स्वयंसेवी वृत्तीने काम करत आहे. आम्ही विविध रेल्वेस्थानकांवर जाऊन सदस्यत्वाचे फॉर्म भरून घेतले. मोदींच्या कामाविषयी लोकांना माहिती दिली. जानेवारीपासून रोज दोन तास मी या कामाला देत आहे. लोकांमध्ये जनजागृती करणं, त्यांच्या समाजाच्या
नरेंद्र मोदींप्रमाणे तरुणाईचं लक्ष वेधून घेतलं आहे आम आदमी पार्टीच्या अरविंद केजरीवाल यांनी! ‘आप’बरोबर सध्या काम करणाऱ्या शरयू जाखोटिया (वय २४ वर्षे) हिच्याशी संवाद साधला तेव्हा ती म्हणाली, ‘‘मी एमबीए करायला अमेरिकेत गेले होते. तेव्हा अण्णा हजारेंनी भारतात जनलोकपालसाठी खूप मोठय़ा प्रमाणावर आंदोलन केलं. त्यांना मोठय़ा प्रमाणात तरुणाईकडून मिळालेला पाठिंबा, अण्णा हजारेंचं उपोषण या सगळ्या बातम्या मी अमेरिकेत टेलिव्हिजनवर बघत होते आणि मी भारावून गेले. माझा या चळवळीला असलेला पाठिंबा दाखविण्यासाठी मी सोशल नेटवìकग साइटवर त्यांचे पेज लाइक केले. त्यांच्या वेबसाइटवरसुद्धा मी देशातील घडामोडींची माहिती मिळवत होते. नोव्हेंबर २०१२ मध्ये मी शिक्षण संपवून
भाजपचा सोशल मीडिया तरुणाईच्या हाती…
तरुणांना आकर्षित करण्यासाठी आज सारेच पक्ष सोशल मीडियाचा वापर करीत आहेत. अर्थात तरुणांना आकर्षित करायचे असेल तर सोशल मीडियावरील भाषा, पोस्टचा विषयदेखील तरुणांना रुचणारा हवा. अन्यथा केवळ पोस्ट टाकून त्याकडे कोणी पाहणार नाही आणि अपेक्षित परिणाम साधणारा नाही. त्यामुळेच की काय, पण भाजपचा सोशल मीडिया सांभाळणारी सारी टीम या तरुणाईने व्यापलेली आहे. विनीत गोयंका या तरुणाच्या नेतृत्वाखाली देशभरात तब्बल ७२ जणांची एक भली मोठी टीम गेल्या एक वर्षांपासून यासाठी चोवीस तास काम करीत आहे. या सर्वामध्ये मुख्यत: तरुणांचा भरणा जास्त आहे. याच टीमपैकी काही जण गेल्या एक वर्षांपासून दिल्लीमध्येच वास्तव्यास आहेत. कोणी आपली नोकरी सोडून आले आहे, तर कोणी नोकरी करीत करीत या कामात आहे.
महत्त्वाचे म्हणजे हे सारे आपापल्या क्षेत्रांत तज्ज्ञ आहेत. रॉबिन हे ४२ वर्षीय तंत्रज्ञ आयटी आर्किटेक्ट असून त्यांनी २००९ च्या निवडणुकांमध्ये काम केले आहे. तंत्रज्ञानाच्या सपोर्टबरोबरच कंटेंट जनरेशनदेखील करतात. तर कल्पना रवी ही इंग्रजीत एमए केलेली स्क्रिप्ट रायटरचे काम पाहणारी तरुणी आपली नोकरी सांभाळून हे काम पाहते आहे. त्या मुख्यत: उच्च वर्गाच्या अनुषंगाने इंग्रजी मजकूर लिहितात. तसेच भाषेबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन चिकित्सक असल्यामुळे सोशल मीडियावर वापरल्या जाणाऱ्या सर्व मजकुराचे बारकाईने वाचन त्या करतात. त्यात गरजेनुसार बदलदेखील करतात. जयवंत थोरात हा डेलमध्ये नोकरी करणारा ३६ वर्षीय अभियंता. निवडणुकांच्या कामासाठी त्यांनी नोकरी सोडली आहे. देशासाठी काही काळ देता यावा यासाठी त्याने नोकरी सोडून मे २०१३ पासून तो या टीममध्ये कार्यरत आहे. डेलमध्ये ट्रेनिंग विभागात रिजनल हेड असल्यामुळे त्याला अनुभवदेखील बराच आहे. या टीममध्ये तो मराठी आणि इंग्रजीमधून कंटेंट लिहिण्याचे काम पाहतो. परेश चौधरी हा जळगावचा २६ वर्षीय तरुण मराठीतून पोस्ट करण्याचे काम करतो. पक्षाकडून आलेल्या मजकुरावर आधारित दिवसभरात २०-२५ पोस्ट तो मराठीतून करीत असतो. हिंदीमध्ये मजकूर लिहिण्याचे काम करणारे रिझवान शेख हा मूळचा मुंबईचा तरुण गेले वर्षभर दिल्लीत वास्तव्यास आहे.
मनोज जोशी, शिल्पी तिवारी असे अनेक तरुण दिल्लीतून मध्यवर्ती केंद्रातून सर्व डिजिटल मीडियावरील कंटेंट सांभाळण्याचे काम करतात. एका कॉमन ग्रुप ई-मेल आयडीच्या आधारे या सर्वाना ब्रिफ दिले जाते. त्यांनी कंटेंट लिहिल्यावर तो तपासून त्याच्या कायदेशीर पक्षीय बाजू तपासून तो ब्लास्टिंग केला जातो. ब्लास्टिंग म्हणजे एकाच वेळी मोठय़ा संख्येत ई-मेलवर मजकूर पाठवणे. यासाठी आजअखेर तब्बल १७००० तरुणांचा सहभाग आहे. या माध्यमातून एकदा पोस्ट केलेला मजकूर पुढे हजारो जणांपर्यंत नेणारे कार्यकर्ते असंख्य आहेत. राज्याच्या पातळीवरच बोलायचे झाले तर आज भाजपकडे पाच हजार कार्यकर्त्यांची टीम आहे. पक्षाकडून येणारा मजकूर सर्वदूर पसरविणे ही त्यांची जबाबदारी आहे.
१) भाजप (नरेंद्र मोदींसाठी
‘मिशन २७२+’ साठीचे उपक्रम)
’ मंथन सदर : राष्ट्रीय लोकशाही आघाडीबद्दल सादरीकरण, १० वर्षांची अराजकता आणि नरेंद्र मोदींची भारताबद्दलची दूरदृष्टी.
’ मेरे सपनों का भारत : या उपक्रमांतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद आणि
या विषयावरील त्यांच्या कल्पनांबद्दल चर्चासत्र.
’ मतदानाची आवश्यकता समजवण्यासाठी ‘वोट इंडिया वोट’ कॅम्पेन.
’ ‘नमो’ चहा वाटप : विविध सणांदरम्यान देवळाजवळील भक्तगणांसाठी.
’ चाय पे चर्चा : संपूर्ण भारतभरातून नरेंद्र मोदींबरोबर प्रत्यक्षदर्शी व्हिडीओ कॉन्फरन्स.
’ इस लिए मोदी : यूटय़ुबवर ‘इस लिए मोदी’ स्पर्धा ज्यात तरुण मोदी आपल्याला पंतप्रधान म्हणून का हवे आहेत, याविषयी भाष्य करणारे व्हिडीओ टाकले जातात.
२) आम आदमी पार्टी (आप)
’ बझ ग्रुप : विविध ठिकाणी जाऊन फ्लॅशमॉब स्वरूपात डान्स करून गर्दी गोळा करून जनजागृती करणे.
’ नुक्कड नाटक : विविध सामाजिक विषयांवर पथनाटय़े करणारी टीम.
’ महाविद्यालयीन उपक्रम : ज्यात तरुणांना विविध महत्त्वाच्या गोष्टींविषयी मार्गदर्शन केले जाते. उदा. माहितीचा अधिकार, विविध महाविद्यालयीन समस्या.
’ वैद्यकीय शिबिरे
’ दारोदारी जाऊन स्वयंसेवकांसाठी प्रचार रॅली
३) काँग्रेस</span>
’ भारत के मजबूत हाथ : या प्रचार माध्यमातून विविध व्यवसायाच्या लोकांनी कसा भारताचा कायापालट झाला आहे हे एका व्हिडीओद्वारे दाखवण्यात आले.
’ अंतर्गत निवडणुका : युथ काँग्रेसच्या मोहिमेतून त्या त्या विभागाचा उमेदवार निवडण्यासाठी अंतर्गत निवडणुका.
’ तुमच्या उमेदवाराला भेटा : या मोहिमेतून आपल्या विभागाच्या उमेदवाराला जाणून घेण्यासाठी लोकांचा सक्रिय सहभाग मिळवला.
’ तरुण भारताचे सामथ्र्य जाणा- राजकारणातील बदलासाठी जास्तीत जास्त तरुण कार्यकर्त्यांचा सहभाग वाढविण्यासाठी विविध संधी देण्यात आल्या.
’ व्यावसायिक प्रशिक्षण : या उपक्रमांतर्गत प्रत्येक ‘युथ काँग्रेस’चा सदस्य अधिक प्रभावी व जाणकार कसा होईल, यासाठी प्रशिक्षण देण्यात आले.
अरविंद केजरीवाल यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याविषयी विचारले शरयू म्हणाली, ‘‘सर्वात आधी जनलोकपाल विधेयक मंजूर करणे हे केजरीवालजींचे मुख्य ध्येय आहे. जे ध्येय सध्याच्या राजकीय स्थितीत शक्य होत नव्हते. तेव्हा राजीनामा दिल्यावर परत निवडणुकांमध्ये निवडून येऊन ‘आप’चे सरकार स्थापन झाले तर हे प्रश्न सहज मार्गी लागतील. त्यांच्या ४९ दिवसांच्या सत्तेत जे चांगले काम केले ते न दाखवता इतर गोष्टींना प्रसारमाध्यमांनी जास्त महत्त्व दिले असे मला वाटते.’’ शरयूच्या म्हणण्याप्रमाणे ‘आप’मध्ये तरुणांच्या विषयांवर जास्त लक्ष दिले जाते, त्यामुळे तरुण मंडळींची संख्या सुद्धा इथे अधिक आहे.
केजरीवाल आणि नरेंद्र मोदींबरोबर राहुल गांधींनीसुद्धा तरुणांची मने काँग्रेसच्या जिंकून घेतली आहेत. ‘राजकारणात तरुण मंडळी हवी आहेत, आजची तरुणाईच उद्याचे उज्ज्वल भविष्य रंगवू शकेल’ असे वारंवार आपल्या भाषणांतून मांडून ‘तरुणाई’ हा अजेंडय़ावरील विषय असल्याचे राहुल गांधींनी दाखवून दिले. ‘युथ काँग्रेस’च्या माध्यमातून तर तरुणाईला एक राजकीय न्यायपीठच त्यांनी उपलब्ध करून दिले
तरुण मंडळींची राजकीय क्षेत्रातील एन्ट्री राजकीय पक्षांनासुद्धा लाभदायक ठरणार आहे. कारण पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुण मतदारांची संख्या ९० हजारच्या वर गेली आहे. तेव्हा अखेर निवडणुकीचे सूत्रधार तरुण मतदार आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.