भारतीय समाज उत्सवप्रिय आहे, या विधानाचा वापर चांगल्या-वाईट दोन्ही अर्थानी केला जातो. अलीकडे तर हे विधान करत टीका करण्याची एक नवी फॅशनही रूढ झाली आहे. भारतीय समाजाच्या बाबतीत ही केवळ उत्सवप्रियता नाही म्हणून अशा स्वरूपाचे विधान करताना थोडी सावधगिरी बाळगावी, असे मानववंशशास्त्रज्ञ सांगतात. कारण त्यामागे प्रथा-परंपरा नाकारण्याचा आणि स्वीकारण्याचा; पर्यायाने भारतीय मानववंशाचा इतिहास जोडलेला आहे, असे अभ्यासान्ती लक्षात आले आहे. आजपर्यंत या प्रथा-परंपरांकडे आपण अभ्यासदृष्टीने कधीच पाहिले नाही. रूढी-परंपरांचे जोखड नाकारतानाही विचारवंतांनी त्यांची हेटाळणीच अधिक केली. मात्र आता मानववंशशास्त्राने हा शास्त्रीय पद्धतीने केलेला अभ्यास किती समाजहितैषी आहे हे सांगत समाजशास्त्राचे एक नवे दालन खुले केले आहे. त्याचा अंतिमत: मानवालाच फायदा होणार आहे व समाजाबद्दल दीर्घकाळ अनुत्तरित राहिलेली कोडी सुटण्यास त्या अभ्यासाची मदतच होणार आहे. गरज आहे ती धार्मिकादी भावना दूर ठेवून त्याकडे डोळसपणे पाहण्याची. हा अभ्यास करणे म्हणजे रूढी-परंपरा पाळणे नव्हे, हे अधोरेखित होणे इथे आवश्यक आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा