पठाणकोटच्या हवाई तळावर दहशतवाद्यांनी घुसखोरी करून केलेल्या हल्ल्याबद्दल आणखी काही महिने तरी चर्चा सुरूच राहील. दरखेपेस दहशतवाद्यांनी हल्ला केला की, मग आपल्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींचा आढावा घेत आपण ती कडेकोट करण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक हल्ल्यानंतर हे असे होणे ही आता नागरिकांसाठीही नित्याची बाब झाली आहे. पठाणकोट हल्ल्याच्या या घटनेनंतर दहशतवाद्यांची पाकिस्तानातून होणारी घुसखोरी रोखण्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. खरे तर घुसखोरी प्रकरणाची सर्वाधिक चर्चा झाली ती, कारगिल युद्धाच्या वेळेस. त्यानंतर संपूर्ण सीमारेखा सील करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आणि पूर्ण सीमेवर काश्मीरमध्ये कुंपण घालण्यात आले. या कुंपणावर मानवी हालचाल टिपणारे सेन्सर्सही बसविण्यात आले. कुंपणामधून आपण विद्युतप्रवाह खेळता ठेवला. त्याचा फायदा म्हणजे कारगिलनंतर घुसखोरीचे प्रमाण खूपच कमी झाले. पण आपण एखादे नवे तंत्र काढले आणि वापरले की, दहशतवादीही त्यावर मात करण्याचा मार्ग शोधतात. कुंपणावर मात करून ते आत भारतीय हद्दीत प्रवेश करतात. अनेकदा निसर्गही यात त्यांना साथ देतो. काश्मीरमधील बर्फ वितळताना घुसखोरी करणे त्यांच्यासाठी खूप सोपे जाते. अशा वेळेस आपल्याला ती रोखणे हे अनेक कारणांनी कठीण जाते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा