एखादी गोष्ट मोफत आहे, असे म्हटले की त्यावर तुटून पडण्याची मानसिकता असते, कमी- अधिक फरकाने ती सर्वत्र पाहायला मिळते. पण त्याबाबतीत भारतीय मंडळी इतरांपेक्षा अंमळ पुढेच आहेत. म्हणून तर ‘बाय टू गेट वन फ्री’च्या फलकासमोर आपल्याकडे ३६५ दिवस गर्दी दिसते. एखाद्या गोष्टीची विक्री ३६५ दिवस सवलतीच्या दरात कशी काय असू शकते, मग त्याची मूळ किंमतच फुगवलेली आहे का किंवा एखादी गोष्ट मोफत दिली जाते आहे, त्यामागे कोणते कारण असू शकते, असे प्रश्न आपण स्वतला फारसे पडूच देत नाही. त्यामुळे मग त्यांची उत्तरे शोधण्याचाही प्रश्नच येत नाही. साहजिकच आहे की, हीच ग्राहकांची मानसिकता हेरून त्या बळावर कंपन्या ग्राहकांवर राज्य करतात. इतर कोणत्याही उत्पादनाच्या बाबतीत हे असेच होत असले तरी जिथे आपले स्वातंत्र्य गहाण पडल्यानंतर त्याचा परिणाम आपल्या प्रगतीवर होणार आहे, तिथे तरी माणसाने स्वार्थासाठी का होईना सजग असायलाच हवे. पण तिथेही आपण फारसे पलीकडे पाहायला तयार नाही, केवळ तात्कालिक विचार करण्यातच धन्यता मानतो आहोत, हे गेल्या खेपेस फेसबुकच्या ‘फ्री बेसिक्स’ला ‘मोफत इंटरनेट’ मिळणार म्हणून सर्रास ‘लाइक्स’ करत सुटलेल्या भारतीयांच्या तोबा संख्येवरून लक्षात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा