गेल्याच महिन्यात रोहित वेमुला या हैदराबाद विद्यापीठातील तरुण संशोधकाने आत्महत्या केल्याच्या प्रकरणानंतर प्रसारमाध्यमे, सोशल मीडिया आणि राजकारणाच्या पातळीवर सर्वत्रच देशभर वातावरण तापले. त्याही वेळेस केंद्र सरकारवर टीकेची झोड उठली होती. विद्यापीठीय प्रकरणांमध्ये केंद्र सरकारने किती लक्ष घालावे किंवा घालू नये यावर चर्चा झाली. सत्तेत असलेल्या पक्षाशी संबंधित विद्यार्थी संघटनांच्या तक्रारी सरकारने किती गांभीर्याने घ्याव्यात, या मुद्दय़ावरही दोन्ही बाजूंनी घमासान झाले. मात्र त्या प्रकरणानंतरही केंद्र सरकारने काही धडा घेतलेला दिसला नाही, हेच आता जवाहरलाल नेहरू विद्यापीठामधील (जेएनयू) प्रकरणानंतर पुन्हा एकदा समोर आले आहे. संसदेवरील दहशतवादी हल्ला प्रकरणातील सिद्धदोष गुन्हेगार अफझल गुरू याच्या फाशीदिनी कार्यक्रम साजरा करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या विद्यार्थ्यांनी देशविरोधी घोषणा दिल्याचा मुद्दा त्यासाठी पुढे करण्यात आला. या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ‘देशद्रोह खपवून घेतला जाणार नाही’ अशी जाहीर भूमिका घेतली. दिल्ली पोलिसांना कारवाई करण्यासाठी तेवढे पुरेसे होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा