विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com
आत्मनिर्भर भारताच्या कितीही बढाया मारल्या तरीही शस्त्रास्त्रांमध्ये अतिमहत्त्वाचे असलेले तंत्रज्ञान विकसित करण्यात आजही भारताला यश आलेले नाही. किंबहुना त्यामुळे रशिया-युक्रेन युद्धामध्ये त्यात सहभागी देशांमध्ये समावेश नसलेल्या, मात्र युद्धाची झळ मोठय़ा प्रमाणावर सहन कराव्या लागणाऱ्या देशांमध्ये भारत अग्रक्रमावर असणार आहे. परराष्ट्र व्यवहार नीतीमध्ये त्यामुळेच तारेवरची कसरत करण्याची वेळ भारतावर आली. एका बाजूस देशाची गरज सांभाळण्यासाठी संयुक्त राष्ट्रांमध्ये रशियाविरोधातील महत्त्वाच्या ठरावाच्या वेळी अनुपस्थित राहण्याच्या नामुष्कीला भारताला सामोरे जावे लागले. आणि त्यामुळेच शांततेचा पुरस्कार करणारा भारत युक्रेनच्या बाजूने उभा का राहात नाही, हा इतर देशांकडून विचारला जाणारा राज‘नैतिक’ प्रश्न येणाऱ्या काळात भारतालाही छळत राहणार आहे. अर्थात आपण आपल्या भूमिकेचे समर्थन करण्याचे प्रयत्न केलेही, मात्र ते सर्वच थोटके ठरले हे वास्तव आहे. कारण तो केवळ थोटका युक्तिवाद आहे. त्यात ठोस व ठाम भूमिकेला वावच नाही. या कोंडीतून भारताला बाहेर पडायचे तर शस्त्रास्त्रनिर्मितीच्या क्षेत्राचे खऱ्या अर्थाने निर्रशियाकरण करावे लागेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा