आपल्या आसपास असलेल्या प्रत्येक क्षेत्रात सध्या एक समान गोष्ट आढळते, ती म्हणजे मूल्यांचा ऱ्हास. एके काळी पवित्र मानल्या जाणाऱ्या शिक्षण क्षेत्राचा ऱ्हास ही चिंताजनक गोष्ट आहे. त्याबरोबरच लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेकडून समाजाच्या वेगळ्या अपेक्षा असत. पण त्याही दिवसेंदिवस फोल ठरत चालल्या आहेत. या सगळ्याच क्षेत्रांमध्ये चांगली माणसं नाहीत असं अजिबातच नाही. पण आजूबाजूची सडलेली, किडलेली व्यवस्था त्यांना टिकू देत नाही. तत्त्व, इमानदारी या सगळ्यापेक्षा ज्यांच्या हातात सत्ता आहे, अशा मूठभरांचे हितसंबंध तुम्ही सांभाळू शकत नसाल तर तुमच्या अस्तित्वाला काही अर्थच उरत नाही. तुम्हाला अशा सगळ्या व्यवस्थेत काडीचीही किंमत नसते. या सगळ्यामधून निखळ माणूस नामशेष कसा होत चालला आहे, अशी मांडणी करणारी ‘नामशेष होणारा माणूस’ ही जयसिंग पाटील यांची महत्त्वाची कादंबरी आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा