प्रेमकथा म्हटलं की सहसा कुणाच्याही डोळ्यांसमोर िहदी सिनेमांच्या ग्लॅमरस कहाण्या येतात. कुणाचा तरी विरोध आणि मग त्यातून तरून जाऊन एकत्र येणं म्हणजे प्रेम असं तद्दन फिल्मी प्रेम आपल्याला सहसा माहित असतं. पण खरं तर प्रेम सुरू होतं, सहजीवन सुरू झाल्यानंतर. रोजच्या जगण्यातल्या एकमेकांच्या न आवडणाऱ्या, न पटणाऱ्या अनेक गोष्टी, जगण्यातल्या अनेक कटकटी, संसारात आलेली वादळं या सगळ्यांना एकमेकांच्या साथीने तोंड देणं, एकमेकांसाठी पहाडासारखं उभं राहणं यातच प्रेमाची खरी कसोटी लागत असते. तिथे कोणतेही फिल्मी योगायोग घडत नसतात. एकमेकांवरचा विश्वास, आपल्या माणसाबद्दल वाटणारी ओढ, उद्या चांगलंच घडणार आहे, याबद्दलची आश्वस्तता या सगळ्यांनी रोजचा अवकाश भरून काढत प्रेम समृद्ध होत जातं. पहाडासारख्या संकटासमोर पहाडासारख्याच मनाने ठाम उभं राहून त्याला तोंड कसं द्यायचं असतं, ते शून्यातून सूर्याकडे या पुस्तकातून वाचायला मिळतं. डॉ. आरती दातार यांचं हे आत्मचरित्र आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा