माणसाच्या विचारप्रक्रियेतच घोळ असल्याने प्रदूषण वाढते आहे. वैचारिक प्रदूषणामुळे पर्यावरणाचे प्रदूषण होते. तीस लाख वर्षांपूर्वी पृथ्वीवर कार्बनडाय ऑक्साइडचे प्रमाण १८० पीपीएम होते. तेव्हा हा ग्रह सगळ्यात स्वच्छ होता. दोन वर्षांपूर्वीचे त्याचे प्रमाण ४०० पीपीएम एवढे असून दरवर्षी ते २ पीपीएमने वाढते आहे. त्या तुलनेत तेव्हा २ टक्के असलेला नागरीकरणाचा वेग आता ५० टक्क्यांवर आला आहे. लोकसंख्येचा स्फोट आणि ऊर्जेचे उत्सर्जन या दोन गोष्टी नियोजन करताना फार महत्त्वाच्या आहेत. जेवढी कॅलरी ऊर्जा जास्त तेवढा कार्बनचा उत्सर्ग जास्त. शहरे असोत वा ग्रामीण भाग, दोन्हीकडे अतिश्रीमंत माणूस हा गरीब आणि मध्यमवर्गीयांपेक्षा १६ पट जास्त प्रदूषण करतो. आपल्या शहरांवर ताण जास्त आहे, कारण आमच्याकडे दरडोई २८ झाडे आहेत. झाडे वाढवण्यासाठी सरकार काय करेल, यापेक्षा आपण काय करू शकतो, याचा विचार झाला पाहिजे. कमीत कमी ऊर्जावापर, चालत कामाच्या ठिकाणी पोहोचता येणे, गाडय़ांपेक्षा सायकलचा पर्याय वाहतुकीसाठी योग्य होईल अशा सुविधा, आहे त्या पर्यावरणाचे जतन-संवर्धन अशा पद्धतीने विचार करून नव्या शहरांचे नियोजन होते आहे. राज्यकर्ते नियोजन करतात, मात्र लोकांनी त्यांना अंमलबजावणीबद्दल धारेवर धरले पाहिजे, प्रश्न विचारले पाहिजेत. लोकांच्या सहभागाने शहरीकरणाच्या प्रक्रियेला वेग येईल.
– महेश झगडे, आयुक्त
पुणे प्रदेश शहर विकास प्राधिकरण.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा