फॅशन शोच्या रॅम्पवरून दिमाखात चालणाऱ्या तरुणी बघताना अनेकांचे डोळे विस्फारले जातात. पण याच रॅम्पवरून गाढवासारखा प्राणी चालणार असेल तर या कल्पनेनंच कुणालाही हसायला येईल. पण हसू नका, अकोटमध्ये नुकताच असा गाढवांचा फॅशन शो झाला..
तरुणाईला आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे फॅशन शो हे नित्याचेच झाले आहेत. साहजिकच फॅशन शोचं ग्लॅमर हे अनेकांचं स्वप्न असतं. पण हाच झगमगाट, वलय गाढवांच्या वाटय़ाला आलं तर?
स्पध्रेतील लज्जो या गाढविणीच्या पाठीवर लिहिले होते, ‘मुझे न छुना म इनकी हूँ ..! ’ परी या गाढविणीने तर ‘म डॉन की बेटी हूँ ..! ’ असा दमच भरला होता. प्रिन्स या गाढवाच्या पाठीवर ‘प्रेम.. प्रेम नाम है मेरा..! ’ असं लिहिलं होतं तर राजकुमार या गाढवाने ‘औंदा लगीन करणारच..! ’ अशी दवंडी पिटली. याशिवाय मांसविक्रीसाठी होणाऱ्या गाढवांच्या कत्तलींवर भाष्य करणारं ‘मला मारू नका.. मला वाचवा.! ’ हा संदेशदेखील अनेकांच्या मनाला चटका लावून गेला. तर काही गाढवांनी गाढवांवरून होणाऱ्या वाळू वाहतुकीच्या समस्येवर भाष्य करत ‘पाऊस नाही.. वाळू नाही. मायबाप सरकार आम्ही जगायचं कसं..’ अशी कैफियत मांडली होती.
या स्पध्रेच्या पाश्र्वभूमीवर शासनाने गाढवपालनाला शेतीपूरक व्यवसाय म्हणून मान्यता द्यावी, झपाटय़ाने कमी होणारी गाढवांची संख्या या चिंताजनक प्रस्तवाकडे सरकारने लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली.
गाढव लीला…
कुठल्याही जत्रेत गधा पन्नालाल, हिरालाल यांच्या हुशारीने होणाऱ्या मनोरंजनाचे किस्से ऐकायला मिळतात. मराठी चित्रपटांमध्येपण ‘गाढवाचं लगीन’सारख्या लोकप्रिय चित्रपटांमधून आपण गाढव चरित्रातले मनोरंजन अनुभवले आहेत. त्याशिवाय सामाजिक निषेध म्हटला की आपल्या डोळ्यासमोर गाढवावर बसवून काढलेली एखाद्याची िधड पटकन आठवते. महाराष्ट्राच्या काही भागांत तर पाऊस लांबला किंवा पाऊस आला नाही तर गाढवाचं लग्न लावून द्यायची एक प्रथा आहे. गाढवाचं लग्न लावून दिल्यास पाऊस हमखास बरसतो अशी ग्रामीण भागात काही लोकांची श्रद्धा आहे.
गाढवाची उपयुक्तता
गाढव हा प्राणी अतिशय कष्टाळू व लाजाळू प्राणी आहे. ओझी वाहून नेण्यासाठी गाढव हे सर्वात स्वस्त साधन आहे. ते ५० किलोपर्यंतचे ओझे सहज वाहून नेऊ शकते. १५ ते १८ हजारांपर्यंत मिळणारं गाढव हे कुठल्याही ऋतूत काम करतं. गाढवांचा आहारपण इतर प्राण्यांसारखाच असतो. भोई, कुंभार, वडार, बेलदार आदी समाज वर्षांनुवष्रे गाढवपालन करत आले आहेत. यातील भोई समाजाने मात्र गाढवपालनाचा परंपरागत व्यवसाय आजही टिकवून ठेवला आहे. गाढव हे आपलं ठिकाण हे कधीच विसरत नाही. अलीबाबा-चाळीस चोर या कथेतही आपल्याला गाढवांची उपयुक्तता दिसतेच. ते मुळीच विसराळू नाही. ते कुणालाही चावत नाही. फारतर चिडून लाथ मारतं. एवढंच काय ते त्याचं उपद्रवमूल्य. गाढवाला एका वेळी एकच पिलू होते. साधारण तीन वर्षांत गाढवाच्या पिलाची वाढ पूर्ण होऊन गाढवात रूपांतर होते.. गाढविणीचे दूध हे मोठय़ा प्रमाणावर पौष्टिक व ताकदवान असल्यामुळे त्याला विशेष मागणी आहे.. तिच्या दुधात रोगप्रतिकारशक्ती खूप असते. गाढवीण एका वेळी जास्तीतजास्त पाव लिटर दूध देऊ शकते. गाढवाला असणाऱ्या विक्रीमूल्यामुळे गाढव प्रजननातून मोठे उत्पन्न मिळवता येते. गाय, म्हैस, बल यांच्यानंतर गाढवाचं विक्रीमूल्य जास्त आहे. गाढवाची विष्ठा शेतीसाठी उत्तम खत म्हणून वापरण्यात येते. कुंभार कामातदेखील गाढवाच्या विष्ठेला मोठी मागणी असते. गाढवांचा कृषिसंलग्न व्यवसायात होणाऱ्या मोठय़ा वापरामुळे गाढवांच्या खरेदी-विक्रीचे काही बाजार नावाजलेले आहेत. गाढवांचा बाजार प्रामुख्याने घोडे माळेगाव (नांदेड), सोलापूर, जेजुरी, िहगोली (मालेगाव), अकोट, देऊळगाव राजा (बुलढाणा), सारंगखेडा (धुळे), मढी (नगर जिल्हा) तर महाराष्ट्राच्या बाहेर मध्य प्रदेशात उज्जन, महू तर गुजरातमध्ये बडोदा येथे गाढवांचा बाजार भरतो.
संतोष विणके – response.lokprabha@expressindia.com