श्रावण महिना दोन्ही हातांनी भरभरून निसर्गाची दौलत उधळत असतो आणि माणसाला ‘घेऊ किती दो करांनी’ असं होऊन जातं. त्याचाच माणसाकडून आविष्कार होतो तो धार्मिक-सांस्कृतिक पातळीवर. त्यामुळेच श्रावणात व्रतवैकल्यांची, सणावारांची रेलचेल होऊन जाते. बहरलेल्या निसर्गाशी एकरूप होणारं उत्साही, उत्सवी मन दर वर्षी नित्यनेमाने प्रथा-परंपरांशी असलेलं आपलं नातं जोपासत राहतं. या प्रथा-परंपरांशी निगडित असलेला एक धागा धार्मिक असतो, तर दुसरा सांस्कृतिक. सांस्कृतिक पातळीवर सणा-समारंभांइतकंच महत्त्व आहे ते खाद्यसंस्कृतीला. महाराष्ट्राच्या कोणत्याही भागात गेलं तर श्रावणातली खाद्यसंस्कृती तिथल्या सामाजिक-भौगोलिक परिस्थितीनुसार वेगळी आहे. साहजिकच तिथले खाद्यपदार्थ वेगळे, चालीरीती-प्रथा वेगळ्या. वर्षांनुवर्षांच्या लोकजीवनातून विकसित होत गेलेलं हे वैविध्य म्हणजे आपलं सांस्कृतिक वैभव आहे. यंदाच्या श्रावणात ‘लोकप्रभा’ने महाराष्ट्रातील या श्रावणी खाद्यसंस्कृतीतील श्रीमंतीचा प्रामुख्याने वेध घेतला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा