दिल्लीमध्ये झालेल्या तीन दिवसांच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात, ‘दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ ही ओळ इतक्या वेळा ऐकली की म्हणावेसे वाटले की, आधी महाराष्ट्रात काय चालले हे तरी पाहा, मग दिल्लीचे तख्त राखायला या! संमेलनाशी निगडित वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये मराठ्यांच्या पराक्रमाबद्दल भरघोस बोलले गेले. मराठ्यांनी अटकेपार झेंडा फडकवला होता. महादजी शिंदे, मल्हारराव होळकर या दोन शूर मराठा सरदारांनी दिल्लीवर वर्चस्व गाजवले होते. त्यांच्या हुकुमावर दिल्लीचे तख्त चालत असे. दिल्लीच्या तख्तावर कोण बसणार हे मराठा सरदार ठरवत असत. मराठ्यांचा हा इतिहास अभिमानास्पद आहे, त्याचा प्रत्येक मराठी माणसाला गर्व असतो, असायलाही हवा. मराठ्यांच्या या गौरवास्पद प्रवासाचा दिल्लीच्या संमेलनात उल्लेख होणे साहजिक होते. इथेच ही चर्चा थांबली असती तर बरे झाले असते, पण काहींनी महाराष्ट्रातील विद्यामान राजकीय प्रवासाचा पट उलगडून दाखवला आणि अखेर आयोजकांनाही म्हणावे लागले की, साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा वैयक्तिक राजकारणासाठी वापर करू नका. राजकारणाची उणीदुणी काढण्यासाठी इतर व्यासपीठे आहेत! आयोजकांनीच संमेलनाच्या राजकीय गैरवापरावर टिप्पणी केली हे खूप बरे झाले. दिल्लीतील संमेलनाच्या तख्तावर राजकारणाचा काटेरी मुकुट कसा लादला गेला, याची ही कदाचित कबुलीच होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा