समकाळातील महत्त्वाच्या कवयित्री म्हणून नीरजा यांची ओळख मराठी साहित्यविश्वाला आहे. त्यांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन आणि एकूणच लेखनविषयक भूमिका सर्वश्रुत आहे. या भूमिकेचा प्रत्यय वाचकांना त्यांच्या कविता आणि कथात्म साहित्यातून वेळोवेळी आलेला आहे. अगदी अलीकडेच त्यांचा ‘विध्वंसाच्या वेदीवर चढण्याआधी..’ हा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला आहे. ऐंशीच्या दशकापासून लेखन करणाऱ्या नीरजा यांची कविता प्रत्येक संग्रहागणिक अधिक प्रगल्भ होत गेलेली आहे. बहुकेंद्री अनुभवविश्व ही त्यांच्या व्यक्तित्वाची खरी ओळख आहे. या संग्रहात एकूण ८८ कविता आहेत. अनुभवाची, आविष्काराची अनेक अर्थपूर्ण रूपे या कवितेतून भेटतात. ही कविता वाचकाला अंतर्मुख करते. कवितेतील प्रत्येक अनुभवाच्या मागे कवयित्रीचे संवेदनशील मन आहे. समकाळातील अनेक सामाजिक, राजकीय संदर्भ या कवितांमध्ये असले तरी प्रामुख्याने ‘स्त्रीसंवेदना’ हा या संग्रहाचा केंद्रबिंदू आहे. मानसिक अंगाने घडलेल्या पुरुष मनातल्या स्त्रीप्रतिमेचा ही कविता जसा विचार करते, तसाच स्त्रीत्वाच्या आदिम, प्राकृतिक भावविश्वाचा शोधही घेते. हा शोध अर्थातच सर्वस्पर्शी आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा