ज्या दिवशी रिक्षाचा संप होतो तो दिवस शहरात बहुतेक लोकांसाठी सुटकेचा आणि शांततेचा दिवस असतो. वाहतूक एरवीपेक्षा सुरळीत आणि शिस्तीत सुरू असते. वाहनांचे भोंगे कमी वाजत असतात आणि त्या सतत पान-तंबाखू थुंकणाऱ्या आणि सामान्य प्रवाशांची गळचेपी करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या मुंगळ्यांपासून शहराची एक दिवस तरी सुटका होते. असा संप होतो तेव्हा मला एक नाव नेहमी आठवते, ते म्हणजे बाबा आढाव. माझ्या लहानपणी हे नाव पुण्यात वरचेवर ऐकू येत असे. ते हल्ली ऐकू येत नाही. या गृहस्थांना मी प्रत्यक्ष कधी भेटलो किंवा पाहिलेले नाही. पण जेव्हा असे रिक्षाचे संप ऐंशी- नव्वदच्या काळात शहरात होत असत आणि रिक्षा सोडून वाहतुकीचा दुसरा पर्याय आम्हाला उपलब्ध नव्हता तेव्हा बाबा आढाव मधेच रिक्षाचा संप करवून आणून सगळ्या शहराचा जीव वेठीला धरायचे. मी ‘पिरदा’ सिनेमातला नाना पाटेकर पाहिला तेव्हा मला असे वाटले, की दिवसा बाहेर न पडणारा हा असा कुणी खलनायकी पावरबाज रिक्षावाल्यांचा हिरो अण्णा असणार. माझी आज्जी बोटे मोडून त्या माणसाला शिव्या देत असे. ‘‘त्याला रिक्षात घालून वेगात वेडावाकडा गावभर फिरवून आणला पाहिजे, म्हणजे ढुंगण दुखायला लागले की रिक्षावाल्यांचा पुळका उतरेल त्याचा!’’ असे ती म्हणायची.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा