‘बहुविधतेमध्ये एकता’ हे भारतीय समाजाचे व्यवच्छेदक लक्षण ठरते. बहुविधता हा भारतीय लोकशाहीच्या स्थर्याचा आणि विकासाचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. त्यास युरोपीय देशांमध्ये ‘अनेकसत्तावाद’ संबोधले जाते. त्याचा वेध भारतात पंडित नेहरूंनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या पुस्तकाद्वारे घेतला होता. अमेरिकन सामाजिक शास्त्रे अनेकसत्तावादाचा सिद्धान्त मांडतात. अशा बहुविधतेवर आधारलेल्या समाजव्यवस्थेचा आणि मूल्यव्यवस्थेचा शोध व पुनशरेधाचा प्रयत्न जगभर सर्वत्र सातत्याने सुरू आहे. अलीकडे अशा प्रयत्नांचा भाग म्हणजे ‘बहुसंस्कृतिवाद’ हा विचार होय. अशा एका वैश्विक मूल्याच्या पुनशरेधाचा आणि जागतिकीकरणाच्या संदर्भात पुनव्र्याख्या करण्याचा प्रयत्न ‘सलोख्याचे प्रदेश- शोध सहिष्णु भारताचा’ या पुस्तकामध्ये केला गेला आहे. प्रसिद्ध पत्रकार सबा नक्वी या पुस्तकाच्या लेखिका आहेत. त्यांनी मिश्र सांस्कृतिक परंपरा अनुभवली आहे. तसेच या परंपरेचा त्यांनी या पुस्तकाद्वारे शोधही घेतला आहे. त्यांच्या या पुस्तकाचा अनुवाद प्रमोद मुजुमदार यांनी केलेला आहे. त्यातील आशय आणि विषय मुजुमदारांनी जसाच्या तसा मराठीमध्ये रूपांतरित केलेला आहे. हे तसे जोखमीचेच काम. परंतु त्यांनी ते सहज सुलभपणे केले आहे. त्यामुळे पुस्तक वाचताना आणि त्यातला आशय समजून घेताना एक नसíगकता त्यात आढळून येते. जणू अनुवादकच बहुविधतेची ही कथा स्वत: मांडतो आहे असे वाटत राहते. अनुवादक त्यातील आशयामध्ये गुंतत गेला आहे. त्यामुळे हे पुस्तक अनुवादितऐवजी स्वतंत्र साहित्यकृती असल्याची अनुभूती वाचकाला देते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा