‘आता निघायची वेळ झाली…!’ या लेखावर साहित्य विश्वातून, साहित्यप्रेमींकडून मोठ्या संख्येने प्रतिक्रिया आल्याच; पण महत्त्वाचं म्हणजे खुद्द महेश एलकुंचवार ‘सर’ व्यक्त झाले. त्यांच्या प्रतिक्रिया फोनमधील तीन तपशील महत्त्वाचे. एक कालिदासासंदर्भातला. ‘‘कालिदासाचा काळ कोणता वगैरे याविषयी मतभेद आहेत. माझा मुद्दा होता तो त्याच्याबद्दल नाही… तर त्याच्या नायकांबद्दल. त्याचे सगळे नायक हे पंचेचाळिशीपन्नाशीचे आहेत आणि तरीही तरुणींभोवती रुंजी घालतात’’, असं सांगत सरांनी वाकाटक वगैरे काल, कालिदास रामटेकला कसा आला असेल वगैरे इतिहास समोर मांडला. दुसरा मुद्दा गोमांस शिजवण्याच्या विधीचा. ‘‘त्याचं नाव मधुपर्क… मधुपाक नाही. भवभूतीच्या उत्तररामचरित्रातही संमासो मधुपर्क: … असा उल्लेख आहे.’’ आणि तिसरा. ‘लोकसत्ता गप्पा’त सहभागी होण्याचा. गप्पांचा तपशील लवकरच…- गिरीश कुबेर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा