कल्पना करा, जी. ए. कुलकर्णी यांचे ‘डोहकाळिमा’, चिं. त्र्यं. खानोलकर यांचे ‘गणुराया आणि चानी’, सुप्रिया दीक्षित यांचे ‘अमलताश’, भालचंद्र नेमाडे यांचे ‘हिंदू’, श्रीराम लागू यांचे ‘लमाण’, नंदा खरे यांचे ‘अंताजीची बखर’ अशी पुस्तके दिली साधारणत: पंधरावर्षीय मुलामुलींच्या हातात.. आणि सांगितले त्यांना : वाचा.. तर काय होईल? अगदी सक्तीच केली तर वाचतीलही; पण या अशा पुस्तकांमध्ये जे काही मांडले आहे, जो या पुस्तकांचा गाभा आहे त्यापर्यंत ही मुले पोहोचू शकतील? थोडे कठीण वाटते. कारण उल्लेख केलेल्या या पुस्तकांची जातकुळी पाहता त्यांच्या गाभ्यापर्यंत पोहोचणे ही तशी सहज, सुलभ गोष्ट नाही. शिक्षण, जगतानाचे अनुभव, दृष्टी विकसित होण्याची प्रक्रिया अशा अनेक घटकांनी माणसाची वाचनदृष्टी विस्तारत, समृद्ध होत जाते. या विस्ताराला अंत नाही, हे खरे असले तरी काहीएक किमान विस्तार होणे हे अशा रीतीच्या साहित्याच्या वाचनासाठी, ते आकळून घेण्यासाठी आवश्यकच. हा असा विस्तार वयाच्या पंधराव्या वर्षी होणे, ही गोष्ट तशी दुर्मीळच.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा