आपल्या भारतात बोलल्या जाणाऱ्या भाषांची संख्या प्रचंड आहे. देशच इतका अवाढव्य, खंडप्राय.. आणि संस्कृतीही इतक्या भिन्न भिन्न, की भाषांची संख्या प्रचंड असणे ओघाने आलेच. संख्येच्या हिशेबात बोलायचे झाले तर आजमितीस देशभरात बोलल्या जाणाऱ्या भाषांची संख्या साडेसातशेपेक्षाही अधिक. देश कशाला, आपल्या महाराष्ट्रातही कितीतरी बोलीभाषा आहेत. त्यांची लिखित प्रमाणभाषा समान असली तरी बोलीभाषांमध्ये वैविध्य आहेच. या अशा मराठी भाषेचे भवितव्य काय, असा प्रश्न कितीतरी वर्षांपासून विचारला जात आहे. सन १९२६ मध्ये इतिहासाचार्य राजवाडे यांनीही तो विचारला होता. ‘मराठी भाषा मुमुर्षू आहे काय?’ या शीर्षकाचा त्यांचा लेख मराठीविषयी, मराठीच्या भवितव्याविषयी चिंता व्यक्त करणारा होता. सुशिक्षित मराठी माणसे इंग्रजीत शिकतात, पत्रव्यवहार इंग्रजीतून करतात, पुस्तके लिहायची झाली तर इंग्रजीचा आधार घेतात. अशा वेळी मराठी भाषा केवळ घरामध्ये- चार भिंतींआड संभाषणापुरतीच मर्यादित राहील की काय, अशी चिंता त्यांना वाटली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा