मराठी भावगीतांच्या प्रवासात आकाशवाणीवरील ‘भावसरगम’ या कार्यक्रमाचे लक्षवेधी योगदान आहे. ‘भावसरगम’ने दिलेली गाणी, गायक-गायिका, गीतकार, संगीतकार हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. ‘भावसरगम’मध्ये गीते लोकप्रिय झाली आणि नंतर कंपनीने ती गाणी तबकडीबद्ध केली असे अनेक वेळा घडले. रसिकांच्या आवडीचे झालेले गाणे त्यांना हवे तेव्हा ऐकायला मिळावे यासाठी रेकॉर्ड कंपन्या शोधक नजरेने काम करीत. त्यामुळे गायक, वादक, गीतकार, संगीतकार असे सर्वच नावारूपाला येऊ लागले. मुंबई आकाशवाणीवरील या कार्यक्रमाप्रमाणे सर्व केंद्रांवरील सुगम संगीताच्या नव्या गीतांच्या कार्यक्रमांनीही अनेक कलाकार दिले. काही संगीतकारांनी पंचाहत्तर टक्के काम आकाशवाणीवर केले, तर पंचवीस टक्के काम ध्वनिमुद्रिकांसाठी केले. यात मराठी भावगीते गाणारे, स्वरबद्ध करणारे अमराठी कलाकारसुद्धा आहेत. ज्यांची मातृभाषा मराठी नाही अशा गायक-गायिकांनी भावगीते गायली. ती लोकप्रियही झाली. अशा गीतांमध्ये एका त्रयीचे गीत चटकन् आठवले. ती त्रयी म्हणजे गीतकार वसंत निनावे, संगीतकार बाळ बरवे आणि गायक तलत महमूद. ते गीत – ‘घे झाकून मुख हे चंद्रमुखी..’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा