भावगीताच्या प्रवासात दिवस मावळला, रात्र झाली अन् चहूकडे अंधार पसरला असे कधी झालेच नाही. अंधारात भावगीताची वाट हरवली असा क्षण आलाच नाही. रात्र झाली, पण या प्रवासातील प्रत्येक रात्र ही पौर्णिमेची रात्र ठरली! गीतकार-संगीतकार आणि गायक-गायिका यांचे योगदान कायम लख्ख प्रकाश देणारे ठरले. त्या प्रकाशात नवनव्या वाटा सापडल्या. पाऊल पुढे जाता जाता वाट निर्माण झाली. भावगीत गाण्यासाठी सुयोग्य, सुमधुर आवाज मिळत गेले. शब्दप्रधान गायकी सांभाळणारे स्वर मिळाले. संगीत नाटक आणि त्यातील पदे हा विषय त्या वेळी आघाडीवर होताच. नाटय़पद गायनाचा बाज ज्यांच्या गळ्यात आहे अशांच्या आवाजातील पदे व नाटके दोन्ही लोकप्रिय झाली. अशा धाटणीच्या, शैलीच्या काही आवाजांचे भावगीत प्रवासात योगदान मिळाले आणि रसिकांनी अक्षरश: त्यांना उचलून धरले. रियाजी आवाज, त्यातील पुरेपूर गोडवा आणि शब्दांचे स्पष्ट तरीही मधुर उच्चार या गोष्टी रसिकांना आवडल्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा