‘सूर व्यवस्थित लागला पाहिजे, एका स्वराकडून दुसऱ्या स्वराकडे जाण्याचा अमुक मार्ग आहे, त्या ठिकाणी नेमके पोचले पाहिजे, योग्य जागी योग्य तोच स्वर लागावा, त्या स्थानी ढाल्या, चढा किंवा नाजूक स्वर लागता कामा नये, शब्दांचे उच्चार स्पष्ट व शुद्ध हवेत, रागाची चौकट सोडू नये..’ अशा सर्व गोष्टींना गाण्याच्या भाषेत ‘तालीम’ म्हणतात. शिष्य चुकत असेल तर हे पुन:पुन्हा सांगणे आवश्यक आहेच. तालमीत संगीतातील सर्व घटकांचा विचार असायला हवा. स्पष्ट उच्चार, उत्तम आविष्कार, आलापी, बोलतान, तानांची फिरत आणि त्यानंतर सर्व स्वरांना स्पर्शून जाणारी तीन सप्तकी तान हे सारे तालमीत शिकता येते. मग जे शिकले ते आविष्कारात आपोआप येतेच. शिवाय त्या काळातील विशिष्ट संगीताचा परिणामही दिसतोच. १९३१ नंतरचा काळ हा शास्त्रीय संगीत आणि नाटय़पदांच्या प्रभावाचा होता. हे सारे आठवण्याचे कारण म्हणजे भावगीतगायनाच्या या आरंभकाळात अनेक शास्त्रीय गायकांची भावगीते रसिकांसमोर आली. त्यावेळी गायकाने गायली आहे ती रागाची बंदिश आहे की भावगीत, असा प्रश्न श्रोत्यांना पडे. उत्तम शब्द, काव्यातील उत्कट कल्पना आणि शास्त्रीय रागाचा आधार हे सर्व या युगात जमून आले. या गीतांमध्ये कविता आहे आणि रागविस्तारही आहे, हे पाहून श्रोते चकित होत. अशा गायकांचे गाणे साहजिकपणेच लोकप्रियही होऊ लागले. या गायकांनी भावगीतांच्या दुनियेत आपला वेगळा ठसा उमटला. या मालिकेतील एक महत्त्वाचे नाव म्हणजे गायक जे. एल. रानडे अर्थात् जनार्दन लक्ष्मण रानडे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा