भावगीतांच्या वाटचालीमध्ये असंख्य गायक-गायिकांचं योगदान आहे. यातल्या कुणी पाच गाणी, कुणी आठ-दहा गाणी, तर कुणी १५ गाणी गायिली आहेत. काही गायक व गायकांनी ध्वनिमुद्रिकांचे शतकदेखील पार केले आहे. संख्येने कमी गाणी गायची संधी मिळालेल्या कलाकारांनीही भावगीतांच्या प्रवासात आपला ठसा उमटवला आहे. आवाज, गायनशैली, गायनाचा पक्का पाया, गायनामध्ये भावदर्शनाची हातोटी या गुणांमुळे त्यांची गाणी रसिकांना आवडलीही. या मालिकेत एका गायिकेचं नाव विसरून चालणार नाही.. गायिका सुमन माटे. त्यांचं वास्तव्य सध्या बदलापूरमध्ये आहे. आज त्यांचे वय ८८ वर्षे आहे. त्यांच्या तल्लख स्मरणशक्तीमुळे असंख्य सुरेल आठवणींना उजाळा मिळाला. त्यांच्यासोबत गाण्यांच्या गोष्टी रंगवताना माझ्याबरोबर ठाण्याचे ध्वनिमुद्रिका संग्राहक गोविंद साठे होते. सुमन माटे यांची भावगीते व भक्तिगीते रसिकांच्या स्मरणात आजही आहेत. त्यापैकी योगेश्वर अभ्यंकर यांचे गीत व बाळ माटे यांचे संगीत असलेले एक भक्तिगीत विशेष लोकप्रिय झाले.. ‘जनी बोलली, भाग्य उजळले..’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा