भावगीतांच्या वाटचालीमध्ये ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या न्यायाने वेगवेगळे आवाज मिळाले, संगीतकारांच्या वैविध्यपूर्ण रचनांनी आनंद दिला, वादकांची कला ठळकपणे नजरेसमोर आली. आवाजांत वेगळेपण मिळाला तसेच साधर्म्यसुद्धा मिळाले. गायिकांमध्ये असा एक सुमधुर आवाज मिळाला, की त्या स्वराने संगीत क्षेत्रात चाळीसहून अधिक वर्षे कारकीर्द गाजवली. त्या काळात अनेक गायक-गायिकांची गाणी गाजत होती. तीव्र स्पर्धा होती. तरीही अत्यंत लोभस व गोड आवाजामुळे एका गायिकेने आपले स्वत:चे असे वेगळे स्थान निर्माण केले. स्पर्धा आणि संघर्षांला सामोरे जाताना या गायिकेने आपला सूर हरवला नाही, गाता गळा कायम राखला आणि यशाची शिखरे काबीज केली. आज वयाच्या ८० व्या वर्षीसुद्धा हा गाता गळा आपल्याला कार्यक्रमांतून भेटतो, हे आपले भाग्य. आपल्या सुमधुर स्वराने जमाना गाजवणाऱ्या या गायिका आहेत.. सुमन कल्याणपूर.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा