कवी सूक्ष्म अशा व्यक्तिशोधातून समोर येतो तेव्हा त्याची कविता आपल्याला जवळची वाटते. या कवितेतील शब्द सहज-सोपे असतील तर ते लगेच आपलेसे होतात. पण प्रथमदर्शनी जर कविता दुबरेध वाटली तर..? तर ती आधी समजून घ्यावी लागते. तिच्या अधिक खोलात शिरत आपण प्रथम त्यातील शब्दकळेच्या प्रेमात पडतो. मग हळूहळू कविता समजायला लागते. ती पूर्णपणे समजावी असा आपला आग्रह नसतो. तिच्यातला आपल्याला भावलेला अर्थ आपण घेतो. कवीच्या अनुभवांची खोली प्रतिमा-प्रतीकांच्या रूपात कवितेत उतरते. त्या आगळ्या शब्दांत दडलेल्या नाद-लयीने आपण भारावून जातो. त्यात दडलेल्या संगीताकडे आपण ओढले जातो. याचे मूळ केशवसुतांच्या ‘झपुर्झा’मध्ये असावे असे वाटते. अशी भावना पुढच्या काळात एका विलक्षण ताकदीच्या कवीच्या शब्दकळेत दिसू लागली. त्यांची कविता आरंभी न समजूनसुद्धा भावली. हळूहळू काव्यप्रेमींना आकृष्ट करीत राहिली. संगीतरचनाकारांना या शब्दांचा मोह पडला आणि त्यांना भावगीतांच्या प्रवासात आशयाच्या आणि अर्थाच्या वेगवेगळ्या वाटा निर्माण करणारे ‘जंक्शन’ सापडले. हे असे स्टेशन आहे- जिथे आपण थबकतोच. या विलक्षण वेगळ्या प्रदेशाचे नाव आहे- माणिक गोडघाटे. त्यांची जनमानसात ओळखीचे असलेले नाव.. कवी ग्रेस!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा