गाणे हे अनुभवांचे शब्दचित्र असते. कवितेचे गाणे होताना तो अनुभव सार्वत्रिक होतो. भावना व स्वरांचा हा संगम असतो. शब्दांतील भावना स्वरबद्ध होऊन गीत जन्माला येते. गेल्या नव्वद वर्षांत मराठी भावगीत असेच रुजले, बहरले. कवितागायनाचा अनुभव रसिकांना आपला वाटू लागला. असंख्य भावगीतांमधून वेगवेगळे विषय आले. रसिकांनी ते आपलेसे केले. निसर्ग, राधा-कृष्ण, सासर-माहेर, प्रीती अशा अनेक विषयांवरील भावगीते श्रोत्यांच्या पसंतीस उतरली. गीत गुणगुणण्याची क्रिया सहजगत्या घडू लागली. त्यातला आनंद वाढत गेला. त्याकाळी आता कोणते नवे गाणे ऐकायला मिळणार, त्याची चाल कशी असेल, ही उत्सुकता शिगेला पोचत असे. श्रोत्यांच्या आवडत्या भावगीतांमध्ये ‘माहेर’ हा विषय ‘वीक पॉइंट’ होता. माहेरावरील प्रत्येक गाणे लोकप्रिय झाले. मग ते ‘माझिया माहेरा..’ असो वा ‘हे माहेर सासर ते, हे काशी, रामेश्वर ते’ हे गीत असो; प्रत्येक गाणे रसिकप्रिय झाले. या माहेरगीतांमध्ये व इतरही भावगीतांमध्ये एका गायिकेचे योगदान मोलाचे आहे. ती गायिका म्हणजे.. मोहनतारा अजिंक्य.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा