निरनिराळे कवी-गीतकार, संगीतकार, गायक-गायिका, वाद्यमेळातील वादक, प्रगत ध्वनिमुद्रण पद्धती अशा अनेक कारणांमुळे भावगीत हे ‘बहरू कळियांसी आला’ अशा स्थितीत रसिकांसमोर येत राहिले. ध्वनिमुद्रिका कंपन्या आणि ‘आकाशवाणी’सारखे सशक्त माध्यम ही गाणी श्रोत्यांपर्यंत सातत्याने पोहोचवण्याचे उदात्त काम करीत राहिले. भावगीत प्रांतात अभिरुची घडविण्याचे काम या माध्यमांनी आणि कलाकारांच्या मैफिलींनी केले. नव्या गीताचे स्वागत करणे व मनापासून दाद देणे हे सहज घडू लागले. भावगीतातील भावना आपल्या वैयक्तिक आयुष्यातील घटनांशी मिळत्या-जुळत्या होऊ लागल्या. भावगीत हे ज्याच्या त्याच्या आठवणींशी निगडित झाले. असेच एक आठवणीतील गाणे.. संगीतकार यशवंत देव, सुरेल धारदार आवाजाच्या गायिका उषा मंगेशकर आणि कवी अनिल या त्रयीने निर्माण केलेले. ‘वेळ झाली भर माध्यान्ह, माथ्यावर तळपे ऊन..’ अशी या गीताची सुरुवात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा