रताळे
वांगे
थोडय़ाशा श्रमाने थकवा येऊ नये, शरीर सक्षम व्हावे म्हणून कोवळी, बिन बियांची वांगी खावीत. घाम कमी येतो, घामावाटे शरीरातील चांगली द्रव्ये, फाजील प्रमाणात बाहेर जाण्याची क्रिया थांबते. जादा बी असलेले वांगे खाऊन आतल्या बियांमुळे वृक्क किंवा मूत्रमार्गात मूत्राश्मरी बनण्याची शक्यता असते. वांगे रुची आणणाऱ्या भाज्यांत अग्रेसर आहे. कफप्रधान व फुप्फुसाच्या विकारांत कोवळ्या वांग्याचा रस किंवा शिजवून फार मसाला न मिसळलेली भाजी खावी. गळू झाले असल्यास वांगे शिजवून त्याच्या पोटिसाचा शेक द्यावा. गळवे बसतात. पू होत नाही. ज्वरामध्ये वांगे शिजवले की, पूर्ण निर्दोष होते. त्यातील काही असलेले नसलेले विषार दूर होतात. कृश व्यक्तींनी शिजवलेलीच वांगी खावीत. तरुणांनी व बलवानांनी – भरपूर श्रमाची कामे ज्यांना करावयाची आहेत – त्यांनी कोवळे , कच्चे वांगे खावे व त्यासोबत आले, लसूण, जिरे, ओवा, लिंबू, मीठ, हिंग, ताक असे तोंडी लावण्याचे पदार्थ प्रकृतीनुरूप व आवडीप्रमाणे खावे.वांग्याच्या पानांचा रस मूत्रल आहे. ज्यांना लघवी कमी होते, मसालेदार पदार्थ किंवा चमचमीत पदार्थ खाऊन लघवीचा त्रास होतो, त्यांनी वांग्याच्या पानांचा रस प्यावा. वृद्ध माणसांच्या कफ विकारात वांग्याच्या पानांचा चहासारखा काढा उपयुक्त आहे. कफ साठला असेल तर वांग्याच्या पानांचा रस प्यावा. कफ पडून जातो. पोटदुखी, मुरडा, मलावरोध असणाऱ्या व वृद्ध व्यक्तींनी वांगी खाणे टाळावे.
सुरण
शेवगा
शेवग्याच्या शेंगेप्रमाणे त्याची कोवळी पाने पालेभाजीकरिता वापरतात. लाल शेवगा हा अधिक औषधी गुणांचा आहे. त्यामध्ये अनेक रासायनिक घटक असतात. समस्त वातविकारांकरिता शेवग्याची पालेभाजी पथ्यकर व उपयुक्त आहे. अग्निमांद्य, कुपचन, आनाह, आध्यान, पोटदुखी, पोटफुगी या वातविकारात पाल्याचा रस वापरावा. वेदना लगेच थांबतात. उचकी लागली असता पानांचा रस प्यावा, लगेच गुण येतो. जेवणानंतर धाप लागल्यास शेवग्याच्या पानांची भाजी खावी किंवा आले स्वरस व शेवग्याच्या पानांचा रस असे मिश्रण जेवणानंतर घ्यावे, धाप थांबते. शेवग्याच्या पानांचा रस डोक्याला चोळावा. कोंडा, नायटा, खवडे बरे होतात. तापातून उठलेल्यांकरिता भूक पूर्ववत व्हावी लागते. त्याकरिता शेवग्याची पालेभाजी प्रशस्त आहे. गळवे बसण्याकरिता पानांचा वाटून लेप करावा.
फळभाज्या, शेंगभाज्या भाग ५
रताळे, रक्ताळू या नावाने मिळणारे कंद उपवासापुरतेच वापरले जातात. रताळे बटाटय़ासारखेच उत्तम पूरक अन्न आहे. बटाटय़ापेक्षा काही चांगले गुण रताळ्यात आहेत. रताळे मधुर, वृष्य, गुरू व स्निग्ध आहे. रताळ्यापासून उत्तम दारू बनवतात. रताळ्याचे पीठ व साखर सर्वसामान्यांकरिता सोपे टॉनिक आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 16-12-2012 at 12:29 IST
मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swasthya ani ayurved fruit vegetable sheng bhajya