आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन आणि महाराष्ट्राने घवघवीत यश पदरी दिल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळात महाराष्ट्राला झुकते माप दिले आहे. प्रादेशिक आणि जातीधर्माचा समन्वय साधताना मोदी यांनी प्रवक्त्यांनाही मंत्रिपदाचा लाभ दिला आहे. भाजपच्या बरोबरीने यश संपादन केलेल्या आणि रालोआतील जुना सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेला मात्र केवळ एकच मंत्रीपद बहाल करण्याच्या कृतीतून त्यांना फारसे महत्व देत नसल्याचे दाखवून दिले आहे.
महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते नितीन गडकरी हे माजी राष्ट्रीय अध्यक्ष असून गेली काही वर्षे ते राष्ट्रीय पातळीवर कार्यरत आहेत. अपेक्षेप्रमाणे त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला आणि विदर्भाला प्रतिनिधीत्व मिळाले. ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे हे ओबीसी समाजाचे व मराठवाडय़ातील आहेत. त्याचबरोबर दीर्घकाळ खासदार राहिलेले रावसाहेब दानवे हे मराठा समाजाचे असून मराठवाडय़ातील नेते आहेत. मुंबईत महायुतीला घवघवीत यश मिळाले व सहाही जागा निवडून आल्या. पियूष गोयल हे राज्यसभेतील खासदार असून मुंबईचे आहेत. गोयल हे भाजपचे राष्ट्रीय खजिनदार व भाजपचे जुने निष्ठावंत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा