शिवसेनेचे राहुल नार्वेकर यांनी उमेदवारी मागे घेतल्याने विधान परिषदेची द्वैवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडल्याने राजकीय घोडेबाजार टळल्याची चर्चा सुरू आहे. नऊ जागांसाठी दहा उमेदवार असल्याने, मतांच्या फोडाफोडीला उधाण येऊन कोणालाही पराभवाला सामोरे जावे लागले असते. सेनेच्या उमेदवाराने नाटय़मय माघार घेतल्याने पराभवाचे सावट निवडणुकीवरूनच दूर झाले, आणि विधानभवनाबाहेर फटाक्यांची आतषबाजी झाली.
काँग्रेस व राष्ट्रवादी प्रत्येकी तीन, भाजपचे दोन तर शिवसेनेचा एक उमेदवार निवडून आला. पक्षाच्या संख्याबळाच्या आधारे राष्ट्रवादीला तिसरा उमेदवार निवडून आणण्याकरिता २५ अतिरिक्त मतांची आवश्यकता होती. १२ अपक्षांचा पाठिंबा असला तरी आणखी १३ मते मिळविण्याचे आव्हान होते. युतीचे तीन सदस्य निवडून येणे शक्य असले तरी भाजप आणि शिवसेनेने प्रत्येकी दोन उमेदवार उभे केल्याने चुरस वाढली होती. अपक्ष वा छोटय़ा पक्षांबरोबरच राजकीय पक्षाच्या आमदारांना उमेदवारांनी गळाला लावले होते. भाजपने मनसेकडे मदतीचा हात पुढे करून आपले दोन्ही उमेदवार निवडून येतील, अशी व्यवस्था केली होती. शिवसेनेनेही दोन्ही जागा लढविण्याचा निर्धार केला होता.
सन २०१० मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठय़ा प्रमाणावर घोडेबाजार झाल्याची चर्चा होती. याच सदस्यसंख्येच्या आधारे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचे चार उमेदवार निवडून आणले होते. आता घोडेबाजार टाळण्याकरिता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुढाकार घेतला. वास्तविक २०१२ मध्ये दहा जागांसाठी निवडणूक असताना काँग्रेसचे चार जण निवडून येणे शक्य होते. पण मुख्यमंत्री चव्हाण यांनी घोडेबाजार टाळण्याकरिता एका जागेचा त्याग केल्याने तेव्हा शिवसेनेचा फायदा झाला होता. यंदाही मुख्यमंत्र्यांची तीच भूमिका होती.

बिनविरोध निवड झालेले
काँग्रेस – शिवाजीराव देशमुख, चंद्रकांत रघुवंशी, हरिभाऊ राठोड
राष्ट्रवादी – हेमंत टकले, किरण पावसकर, आनंद ठाकूर
भाजप – विनोद तावडे, पांडुरंग फुंडकर
शिवसेना – नीलम गोऱ्हे

congress state president nana patole calls mahayuti government corrupt
महायुतीचे सरकार भ्रष्ट, तीन पक्षांत मलई खाण्याची स्पर्धा; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा घणाघात
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
scam in hoardings revenue in palghar news update
शहरबात : बॅनरचे उत्पन्न गेले कुठे?
SC asks Centre and states not to take steps to reduce forest
परवानगीशिवाय वनक्षेत्र कमी करू नका!सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र आणि राज्य सरकारांना आदेश
Supreme Court On Mahakumbh Stampede
Supreme Court : “ही दुर्दैवी घटना, पण…”, कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या घटनेवरील सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार, याचिकाकर्त्याला दिले ‘हे’ आदेश
काँग्रेसची ईगल समिती नेमकं कसं काम करणार? कथित मतदार घोटाळ्यांचा छडा लागणार? (फोटो सौजन्य)
Political News : काँग्रेसची ईगल समिती नेमकं कसं काम करणार? कथित मतदार घोटाळ्यांचा छडा लागणार?
Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका
Why were local elections delayed in the state
राज्यात स्थानिक निवडणुका लांबणीवर का पडल्या? तिसरी बाजी कोणाची? 

लाल दिवा कायम
विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख आणि विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांची फेरनिवड झाल्याने दोघांचाही लाल दिवा कायम राहिल अशीच चिन्हे आहेत. सभापतीपदावरून वाद नको म्हणूनच काँग्रेसने देशमुख यांनाच प्रकृती साथ देत नसतानाही उमेदवारी दिली होती.

Story img Loader