निवडणुकीच्या धामधुमीत दारूच्या पाटर्य़ाना चांगलाच ऊत येतो. मात्र या दारूचा मतदान तसेच निवडणूक प्रक्रियेवर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी मतदानाच्या दोन दिवस आधीपासूनच दारूबंदी करा, असे निर्देश निवडणूक आयोगाने बुधवारी सर्व राज्यांना दिले आहेत. नऊ टप्प्यांत पार पडणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सात एप्रिलपासून मतदान होणार आहे. लोकसभेसाठी लागू असणारा हा निर्णय अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, ओदिशा आणि सिक्कीम या चार राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठीही लागू होणार असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. १६ मे रोजी जेव्हा मतमोजणी होईल, तेव्हाही दारू विक्री करणे, हॉटेलमध्ये दारू देण्यास मज्जाव करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
या प्रकरणी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र धाडण्यात आले आहे. दारूबंदीच्या काळात दारूच्या साठा करण्यासही निवडणूक आयोगाने मनाई केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा