भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी सोमवारी मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रभुरामचंद्रांच्या नावाचा आधार घेतला. प्रभुरामचंद्रांच्या जन्मस्थानी राहणाऱ्या रहिवाशांनी, काँग्रेस आणि त्या पक्षाला मदत करणाऱ्यांना धडा शिकवावा, असे आवाहन या वेळी मोदी यांनी केले.
अयोध्येतील वादग्रस्त ठिकाणी राममंदिर उभारण्याच्या पक्षाच्या संकल्पनेबाबत मोदी यांनी काही संदर्भ दिले. प्रभुरामचंद्रांची उदाहरणे देऊन मोदी यांनी जनतेला काँग्रेस, सपा आणि बसपाचा पराभव करून भाजपला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. या वेळी व्यासपीठावर मागील बाजूला प्रभुरामचंद्रांचे मोठे छायाचित्र लावण्यात आले होते.
ही श्रीरामचंद्रांची भूमी आहे आणि येथील जनतेचा ‘प्राण जाए पर वचन न जाए’ यावर विश्वास आहे, ज्यांनी आपल्या आश्वासनांकडे पाठ फिरविली त्यांना आपण माफ करणार का, असा सवालही या वेळी मोदी यांनी केला. देशातील १० कोटी जनतेला रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन सत्तारूढ पक्षाने दिले होते, त्याचा मोदी यांनी संदर्भ दिला. उत्तर प्रदेशातील सत्तारूढ सपा आणि मायावती यांच्या नेतृत्वाखालील बसपा हे लखनऊमध्ये एकमेकांचे शत्रू आहेत, मात्र दिल्लीत ते मित्र आहेत. या दोघांनीच सोनिया-राहुल यांचे सरकार वाचविले आणि काँग्रेसने या दोघांना सीबीआयपासून वाचविले, असेही मोदी म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा