लोकसभा निवडणुकीत विजय मिळो अथवा न मिळो, काँग्रेस पक्षात या निवडणुकीनंतर मोठे बदल पाहावयास मिळतील, असे केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी म्हटले आहे.युवकांना सक्षम केले पाहिजे, त्यांना अधिकाधिक अधिकार दिले पाहिजेत, त्यामुळे निवडणुकीचे निकाल काहीही लागले तरी पक्षाचा चेहरामोहरा बदलेलच, असेही रमेश म्हणाले. काँग्रेसने ३० ते ४० वर्षे वयोगटांतील बहुसंख्य उमेदवारांना तिकीट दिले आहे, आता कात टाकून नव्या रूपातील काँग्रेस अस्तित्वात आणण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या रूपाने आपल्याला नवे नेतृत्व मिळाले आहे. त्यामुळे ज्येष्ठांनी पक्षात राहूनच तरुण रक्ताला जास्त वाव देण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. आपल्याला भरपूर भ्रमंती करावयाची असल्याचेही ते म्हणाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा