टक्कर तर होणारच..!
महाराष्ट्राच्या एक अष्टमांश मतदारसंघ असलेल्या मुंबईने २००९च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला साफ नाकारले. राज ठाकरे यांच्या मनसेमुळे युतीचा धुव्वा उडाला आणि काँग्रेस आघाडीचा झेंडा घेऊन सहा खासदार संसदेत पोहोचले. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राच्या या राजधानीत अनेक राजकीय स्थित्यंतरे झाली. नंतरच्या महापालिका निवडणुकीत सेना-भाजप युतीचा भगवा पालिकेवर फडकला, मनसेची वाटचालही मंदावली. २४ एप्रिलला पुन्हा मुंबईचे सहा लोकसभा मतदारसंघ आपले खासदार निवडणार आहेत. या निवडणुकीवर महायुतीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा पूर्ण पगडा असल्याचा दावा केला जात आहे. दुसरीकडे आम आदमी पक्षही रिंगणात उतरला आहे. गेल्या निवडणुकीत मनसेमुळे सेना-भाजप युतीला फटका बसला होता, तर या वेळी आपच्या उमेदवारांची सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीला धास्ती वाटत आहे. या पाश्र्वभूमीवर, सहा मतदारसंघांत काटय़ाची टक्कर ठरलेली आहे. मुंबईकर मतदार मतदानासाठी सज्ज झाला आहे. काय करायचे हेदेखील त्याने ठरवून टाकले आहे. तरीही, गेल्या दीडदोन महिन्यांत ढवळून निघालेल्या राजकारणाचे सावट त्याच्या निर्णयावरही राहिलेलेच आहे. भाजप-सेना-रिपाइं महायुती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांच्यातच लढत होणार हे ठरलेले आहे. म्हणूनच ही लढत रंगतदारही ठरणार आहे. कारण या रणमैदानाचा रंग या वेळी काही वेगळाच आहे..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा