शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्यात महाविकासआघाडीचे सरकार आले. तत्पूर्वी साधारण महिनाभर भाजपा विरुद्ध शिवसेना व आघाडीत सत्तासंघर्ष सुरू होता. एवढेच नाहीतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या समर्थनाने भाजपाने सरकार स्थापन केल्यानंतर हा संघर्ष सर्वोच्च न्यायलायात देखील पोहचला होता. अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत केलेल्या घरवापसीमुळे देवेंद्र फडणवीस यांना देखील मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर गुरूवारी महाविकास आघाडीच्यावतीने उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रपदाची शपथ घेतली. भाजपाची साथ सोडत व एनडीएमधून बाहेर पडत काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जाऊन सरकार स्थापन केलेल्या शिवसेनेवर केंद्रीय मंत्री भाजापाचे नेते गिरराज सिंह यांनी घणाघात केला आहे. आता शिवसैनिकाला प्रभू रामाचे नाव घेण्यासाठी सोनिया गांधी यांचे निवासस्थान असलेल्या १० जनपथवर नाक रगडावे लागेल, अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा