मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आज चाकण येथील झालेल्या आंदोलनाच्या दरम्यान एसटी बस आणि खासगी गाड्यांची तोडफोड आणि जाळण्याच्या घटना घडल्या आहे. त्यामुळे पुणे विभागाकडून शिवाजीनगर आणि स्वारगेट आगारामधून बाहेरगावी जाणाऱ्या एसटीच्या फेऱ्या दुपारपासून रद्द करण्यात आल्या होत्या.

आतापर्यंत 10 बसेसचे नुकसान झाले असल्याची माहिती मिळत असून, नेमका आकडा मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. एसटी विभागाचे 40 लाखांचे नुकसान झाले आहे अशी माहिती एसटी पुणे विभागाचे नियंत्रण कक्षाच्या यामिनी जोशी यांनी दिली.

Eknath shinde loksatta news
रायगड, नाशिकच्या पालकमंत्रीपदांचा तिढा लवकरच सुटेल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Pune Traffic Congestion, Amitesh Kumar,
पुणे : कोंडी फोडण्यासाठी आयुक्त रस्त्यावर, अतिक्रमणांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’चे आदेश
Buldhana, illegal biodiesel, Mumbai squad ,
बुलढाणा : ७१ लाखांचे अवैध बायोडिझेल टँकरसह जप्त! मुंबईच्या पथकाची ‘हाय-वे’वर कारवाई
Police should have control over traffic system Minister of State for Home Yogesh Kadam expects
वाहतूक व्यवस्थेवर पोलिसांचे नियंत्रण हवे; गृह राज्यमंत्र्यांची अपेक्षा
Explosion at an ordnance manufacturing factory in Jawahar Nagar
भंडाऱ्यातील घटनेमुळे देशभरातील आयुध निर्माणीतील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे का?
rto measures for safe travel on the Mumbai-Nashik highway
मुंबई नाशिक महामार्गावरील सुरक्षित प्रवासासाठी उपायांची जंत्री
Protesters demand that Vishalgad should be cleared of encroachments and dargah should be removed
विशाळगड अतिक्रमणमुक्त करत दर्गा हटवा; आंदोलकांची मागणी

मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण लागू करण्यात यावे, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने पुणे ग्रामीणच्या चाकण भागात हिंसक आंदोलन सुरु होते. यावेळी आंदोलकांनी अनेक एसटी गाड्यांसह पीएमपीच्या बसेसची जाळपोळ करीत पुणे-नाशिक महामार्ग रोखून धरला. आंदोलकांना पसरवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पिंपरी-चिंचवड भागात मराठा समाजाचे आंदोलन सुरु होते. दरम्यान, आंदोलकांनी आळंदी, खेड, चाकण, हिंजवडी येथे बंदचे आवाहन केले होते. त्यामुळे हिंजवडी वगळता सर्वत्र कडकडीत बंद असून सर्व व्यवहार ठप्प झाले होते. दरम्यान, चाकण येथे काही आंदोलकांनी हिंसक होत २५ ते ३० बसेसची जाळपोळ केली.

Story img Loader