विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून दोन आठवड्यांचा कालावधी उलटला. तरी राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. एकीकडे शिवसेना तर दुसरीकडे भाजपा दोन्ही पक्ष आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद आणि सत्तेत समसमान वाटा या आपल्या मागणीवर शिवसेना ठाम आहे. तर दुसरीकडे भाजपा मुख्यमंत्रिपद शिवसेनेला देण्यास तयार नाही. अशा परिस्थितीत आघाडीच्या काही नेत्यांकडून शिवसेनेला पाठींबा देण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यात शिवसेनेला पाठींबा देत आघाडीचं सरकार येणार की महायुतीचं याकडे आता सर्वांच लक्ष लागून आहे.

गुरूवारी भाजपाच्या काही नेत्यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली. परंतु यावेळी भाजपाकडून सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला नाही. तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्रिपदाची अडीच वर्ष आणि सत्तेतील समान वाटपाचाच सूर निघाला. आपल्या अटी मान्य असतील तर फोन करा अन्यथा नाही केलात तरी चालेल असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. त्यामुळे हा तिढा गुरूवारीही सुटू शकला नाही. ९ नोव्हेंबर रोजी राज्याची विधानसभा बर्खास्त होणार आहे. विधानसभा निवडणुकीत १०५ जागा मिळवत भाजपा मोठा पक्ष ठरला आहे. परंतु लोकसभा निवडणुकीदरम्यान झालेल्या वाटाघाटीनुसार मुख्यमंत्रिपदावर शिवसेनाही आपला दावा सांगत आहेत.

Madhya Pradesh Chief Minister Mohan Yadav Congress PM Modi Constitution
संपत्ती हिसकावून घेऊन ती घुसखोरांमध्ये वाटण्याचा काँग्रेसचा कट; मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा दावा
Jaganmohan, Chandrababu Naidu,
आंध्रमध्ये सत्तेत जगनमोहन की चंद्राबाबू ?
Mamata Banerjee demands Governos resignation over forest encroachment issue
राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी; वनयभंगाच्या मुद्द्यावरून ममता बॅनर्जी आक्रमक
arvind kejriwal
‘मोकळय़ा’ केजरीवालांच्या तावडीत आता भाजपचे सावज!
State Deputy Chief Minister Ajit Pawar gave lure to voters
पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मतदारांना आमिष! म्हणाले, पोशाख करतो, अंगठी करतो…
Eknath Shinde Sanjay Raut
नाशिकमध्ये ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा? संजय राऊत राजकीय स्फोट करण्याच्या तयारीत
thane lok sabha cm eknath shinde marathi news, cm eknath shinde thane lok sabha marathi news
ठाण्यात भाजप, नाईकांना रोखण्यात मुख्यमंत्री यशस्वी
andhra pradesh cm ys jaganmohan reddy got challenge by his sister ys sharmila in lok sabha election
आंध्रच्या मुख्यमंत्र्यांविरोधात घरातूनच संघर्ष

कमी जागा असूनही शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपदाचा हट्ट धरण्यात आला आहे. परंतु यापूर्वीही अशी घटना घडली होती. १९९९ मध्येही असा प्रसंग घडला होता. १९९९ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला ६९ तर भाजपाला ५६ जागांवर विजय मिळाला होता. त्यावेळीही भाजपाने शिवसेनेकडे मुख्यमंत्रिपदाचा आग्रह धरला होता. त्यानंतर भाजपाच्या नेत्यांनी यासंदर्भात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती. तसंच त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु बाळासाहेब ठाकरे यांनी नकार दिला होता. त्यानंतर सत्तास्थापनेसाठी शिवसेनेकडून प्रयत्न करण्यात आले. परंतु त्यांना यश आलं नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं सरकार स्थापन करत मुख्यमंत्रिपदाची माळ विलासराव देशमुखांच्या गळ्यात घातली होती.