अतिवृष्टीमुळे विदर्भात नद्यांना आलेल्या पुरात २०० हून अधिक  जणांचे बळी गेले आहेत. पकी यवतमाळ जिल्ह्य़ात २९ जण मृत पावले, तर २ हजाराहून अधिक जनावरे दगावली आहेत. या नुकसानग्रस्तांना केंद्र शासनाकडून योग्य मदत मिळावी, यासाठी आपण पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग, केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची भेट घेतली असून नुकसानग्रस्तांना योग्य मदत केली जाईल, असे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.
 विदर्भात ६.५० लाख हेक्टर शेतजमीन बाधित झाली, तर अनेक घरे   उध्वस्त झाले आहेत. नुकसानीचे सर्वेक्षण महसूल प्रशासनाकडून सुरू असून १ हजार ९८५ कोटी रुपयांची विदर्भाला गरज असल्याचे प्राथमिक अंदाजातून स्पष्ट होते. विदर्भातील अंदाजे ६५० कि.मी.चे रस्ते, ८०० मोठे पूल, ७०० लहान पुलांचे नुकसान झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 200 deaths of heavy rainfall in vidarbha