कराडनजीकच्या जयवंत शुगर साखर कारखान्याच्या सुमारे ६ लाख ७३ हजार १५० रुपये किमतीच्या साखरेचा अपहार केल्याप्रकरणी तीन जणांवर उंब्रज पोलीस ठाण्यात पुणे येथील ट्रान्सपोर्ट कंपनीच्या व्यवस्थापकाने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयवंत शुगरची ६ लाख ७३ हजार १५० रुपये किमतीची सुमारे २५० क्विंटल साखर पुणे येथील चौधरी ट्रान्सपोर्टमधून मालट्रकने (क्रमांक आर जे २१ जीए ५१२५) बिकानेर येथील साखर व्यापाऱ्याकडे १५ मार्चपर्यंत पोहोचणे अपेक्षित होते.
मात्र, १९ मार्चअखेर मालट्रक पोहोचला नाही. या प्रकरणी ट्रान्सपोर्ट कंपनीच्या व्यवस्थापकांनी वारंवार ट्रकचालकाशी मोबाइलवर संपर्क साधला. मात्र ट्रक नादुरुस्त आहे. पोहोचण्यास वेळ लागेल अशी वेगवेगळी कारणे ट्रकचालकाकडून दिली जात होती. अखेर चौधरी ट्रान्सपोर्टचे व्यवस्थापक अशोक सीताराम राजपुरोहित यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात ट्रकमालक ओमप्रकाश रामजीवन माळी (रा. भसवासी, ता. नागोरी, राजस्थान), दुसरा चालक हनुमानसिंग (पूर्ण नाव माहीत नाही), ट्रक क्लीनर दिलीप ओमप्रकाश माळी या तिघांनी साखर पोत्यांचा अपहार केला असल्याची फिर्याद दिली आहे.
जयवंत शुगर्सची २५ टन साखर लंपास झाल्याची तक्रार
कराडनजीकच्या जयवंत शुगर साखर कारखान्याच्या सुमारे ६ लाख ७३ हजार १५० रुपये किमतीच्या साखरेचा अपहार केल्याप्रकरणी तीन जणांवर उंब्रज पोलीस ठाण्यात पुणे येथील ट्रान्सपोर्ट कंपनीच्या व्यवस्थापकाने फिर्याद दिली आहे.

First published on: 28-03-2014 at 03:47 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 25 tons sugar stolen of jaiwant sugars