नांदेड :  मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावरील कथित अन्याय आणि त्यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी करण्याची घोषणा यामुळे नाराज झालेल्या मराठा समाजाने नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत २५० पेक्षा अधिक उमेदवार उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर चव्हाण यांच्या प्रभावक्षेत्रातूनच आरक्षण लढय़ाला नवे वळण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अर्धापूर या तालुक्यातील पिंपळगाव (महादेव) ग्रामपंचायतीने गावातल्या दहा मराठा युवकांना लोकसभा निवडणुकीत उतरविण्याचा ठराव मंजूर केला. त्यानंतर अर्धापूर तालुक्यातून २५० मराठा युवकांना निवडणुकीत उभे करण्याचे ठरले असून अशा राजकीय कृतीतून राज्य सरकारविरुद्धचा असंतोष व्यक्त केला जाणार आहे. अर्धापूर येथे झालेल्या बैठकीला विविध नेत्यांसह सुमारे शंभर कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

mla Vijay Shivtare of Shiv Sena Shinde faction has been removed from District Planning Committee
आमदार शिवतरेंना वगळले, महायुतीत वादाची ठिणगी ?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Mumbai City District Planning Committee meeting in the presence of Eknath Shinde
६९० कोटींच्या आराखड्यास मान्यता; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीची बैठक
women given special discounts by builders in thane
ठाण्यात बिल्डरांकडूनही लाडक्या बहिणींना विशेष सवलत; यंदाच्या मालमत्ता प्रदर्शनात १०० हून अधिक गृहप्रकल्पांचे स्टॉल
Shiv Sena Shinde group strategizes for party growth before upcoming Pune Municipal Corporation elections
पुण्यावर शिंदे गटाचा ‘आवाज’ वाढणार
State Transport Minister Pratap Sarnaik announced 50 new Lalpari buses for Dharashiv district
धाराशिव जिल्ह्यासाठी ५० नवीन लालपरी पालकमंत्री, प्रताप सरनाईक यांची घोषणा
minister madhuri misal instructed pune municipal corporation
दंडमाफीचा प्रस्ताव द्या, नगरविकास राज्यमंत्र्यांनी महापालिकेला काय केल्या सूचना ?
Eknath shinde bjp loksatta
एकनाथ शिंदेंच्या नाराजीमुळेच पालकमंत्री नियुक्तीला स्थगिती

हेही वाचा >>>“…तर आम्ही भाजपा-आरएसएसबरोबर जाऊ शकतो”, प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

मराठा आरक्षण आंदोलनात इतर राजकीय नेत्यांच्या तुलनेत अशोक चव्हाण यांच्यावर अधिक टीका केली जात होती. मराठा आरक्षणासाठी त्यांनी काँग्रेस पक्षात असताना भाजपच्या धोरणाचा समाचार घेतला. पण गेल्या महिन्यात भाजपत प्रवेश करून त्यांनी आपले राजकीय स्थान सुरक्षित केले. ही बाब सकल मराठा समाजाला खटकली. याची जाणीव झाल्यावर चव्हाण यांनी वेगवेगळय़ा माध्यमातून मराठा मतदारांचा संभाव्य कल जाणून घेण्यास सुरुवात केली आहे.

चव्हाण यांचा प्रभाव असलेल्या भोकर मतदारसंघात तीन तालुके समाविष्ट असून या तालुक्यात मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांची संख्या अधिक आहे. त्यांनी राजकीय लढाईचा प्रसार व प्रचार सुरू केला आहे. मराठा समाजातील कोणत्याही मोठय़ा नेत्याने मतप्रदर्शन केलेले नाही किंवा लढाई पुकारणाऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला नाही, याकडेही लक्ष वेधण्यात आले.

Story img Loader