टायर फुटून गाडी दरीत कोसळल्याने गुजरात पांडेसरा येथील एकाच कुटुंबातील पाच जण जागीच ठार झाले, तर दोघे जण गंभीर जखमी झाले. हा भीषण अपघात शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता झाराप-पत्रादेवी महामार्गावर मळगाव ब्राह्मणआळी येथे घडला. जयशभाई सीताराम नारकर (४१), धनगौरीबेन जयशभाई नारकर (४०), रोहन जयशभाई नारकर (२१), सपना मुकुंद पोल (३०), मंथन मुकुंद पोल (७) अशी मृतांची नावे असून, जेनिश जयशभाई नारकर (१६) व मुकुंद पोल (३५) हे दोघे या अपघातातून वाचले. जयशभाई नारकर हे मूळचे रत्नागिरीचे असून गेली काही वर्षे ते मुलगा जेनिश यांच्याकडे गुजरातमध्येच राहत होते. नारकर कुटुंबीय गुजरातहून गोवा फिरण्याकरिता फोक्स व्हॅगन व्हिन्टा कारने आले होते. शनिवारी सकाळी ते गोव्याहून गुजरात येथे परतत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा