धाराशिव : तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील प्राचीन आणि दुर्मिळ दागिन्यांची चोरी, चोरी करणारे आरोपी, प्रशासनातील सहभागी असलेल्या कर्मचारी आणि अधिकार्यांचे गोपनीय अहवाल, अशा एक ना दोन तब्बल ५५ संचिका तुळजाभवानी मंदिरातून गायब झाल्या आहेत. मंदिरातील घोटाळे दडपून टाकण्यासाठीच या संचिका गायब केल्या असल्याचा आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी या संचिका गायब असल्याचा तपासणी अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आला होता. त्यानंतरही संबंधित अधिकारी आणि कर्मचार्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. मंदिर समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत. त्यामुळे जिल्हाधिकार्यांचेही याकडे दुर्लक्ष आहे काय? असा सवाल पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी उपस्थित केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा